जालना दि. 23 (जिमाका) :- दि.1 जुन 2022 रोजी पासून पदव्युत्तर परीक्षा सुरु झालेल्या
आहेत. तसेच सध्या अग्निपथ योजनेवरुन
मोर्चे, निदर्शने, आंदोलनाचे प्रकार वाढले आहे. सध्या महाराष्ट्रात राजकीय
दृष्ट्या सत्ताधारी व विरोधकात एकमेकाविरुध्द आरोप प्रत्यारोप विविध कारणास्तव
सुरु आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण मिळावे या मागणीसाठी तसेच शेतक-यांचे विविध
मागणीसाठी विविध संघटनांकडून आत्मदहन, उपोषण, धरणे, मोर्चे, निदर्शने, रास्तारोको
इत्यादी सर्व प्रकारण्ची आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्तता नाकरता येत
नाही.
त्यामुळे
अपर जिल्हादंडाधिकारी जालना यांना प्राप्त अधिकारानुसार
पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये शासकीय कर्तव्य पार पाडणा-या
कर्मचा-यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्या आसपास
शस्त्रे, लाठ्या, सोटे, बंदुके, तलवारी , भाले, चाकु व इतर
शरीरास इजा अथवा अपाय करणा-या वस्तु जवळ बाळगणार नाही. तीक्ष्ण पदार्थ अथवा
स्फोटके सहज हाताळता येतील अशी घातक वस्तु जवळ बाळगणार नाही. दगड किंवा इतर उपकरणे
किंवा प्रवर्तक शस्त्रे गोळा करुन ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाही.
व्यक्तींच्या किंवा समुहाच्या भावना जाणुनबुजुन दुखविण्याचे उद्देशाने असभ्यतेने
भाषण म्हणणार नाही, वाद्य वाजविणार नाही, गाणे म्हणणार नाही. व्यक्तींचे किंवा शवाचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन
करणार नाही. आवेषी भाषण, अंगविक्षेप,विडंबनापर
नकला करणार नाही आणि सभ्यता किंवा नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे
राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा कोणतीही वस्तु बाळगणार नाही.
हा आदेश संपुर्ण जिल्ह्यासाठी दि.
23 जुन 2022 रोजीच्या 6.00
वाजेपासुन ते दि.7 जुलै 2022 रोजीचे
रात्री 12.00 वाजेपर्यंत अंमलात राहील.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment