Wednesday 28 December 2016

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव देण्यासाठी शासन कटिबद्ध - पालकमंत्री बबनराव लोणीकर

जालना, दि. 28 – शेतकऱ्यांसह सर्वसामान्य व्यक्तीच्या विकासासाठी शासन सातत्याने प्रयत्नशिल संपूर्ण जिल्ह्यात दर्जेदार रस्ते, मुबलक प्रमाणात पाणी, वीज व शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
            शेलगांव-अंगलगांव (75 लक्ष), ग्रा.पं.कार्यालय (12 लक्ष), सिमेंट रोड (6 लक्ष ), लिंगसा-लिखीत पिंप्री (30 लक्ष), लिंगसा जलयुक्त शिवार (32 लक्ष), सभामंडप (07 लक्ष), सिमेंट  रस्ता (3 लक्ष), लिखीत पिंप्री सभामंडप (7 लक्ष) आष्टी रोड ते हास्तुर तांडा (30 लक्ष), आष्टी ते पळशी आनंदगाव (20 लक्ष), लिखीत पिंप्री सौरपंप (05 लक्ष), हास्तुर तांडा सिमेंट रस्ता (3 लक्ष ) या रस्त्याच्या डांबरीकरणासह ब्राम्हणवाडी येथे जलयुक्त शिवार अंतर्गत सिमेंट नाला बांध (22)लक्ष, आमदार फंड अंतर्गत सामाजिक सभागृह (7 लक्ष), लिंगसा ता. परतूर येथे आमदार फंड अंतर्गत सामाजिक सभागृह (7)  व 25/15 निधी अंतर्गत रस्ता (3 लक्ष) इत्यादी  कामांच्या उदघाटन प्रसंगी पालकमंत्री बबनराव लोणीकर बोलत होते.
            यावेळी राहुल लोणीकर, गोपाळ बोराडे, मदनलाल शिंगी, पांडूआबा सोळंके, माणीकराव वाघमारे, शहाजी राक्षे, रामप्रसाद थोरात, दिलीप थोरात, अमोल जोशी, सिध्दू सोळंके, सुदाम प्रधान, विनायक लहाने, गजानन लिपणे, दिनकर लिपणे, बालासाहेब कोरडे, अशोक सोळंके, अच्चुत पवार, भास्कर सोळंके, भरत देशमुख, हरीभाउ चौधरी, बाबाराव थोरात, राजू मालधन, विष्णू सोळंके, बाळासाहेब सोळंके, रमेश राठोड, माउली चौरे, सुभानभाई जमीनदार, शिवदास आढे, सखाराम खांडेभराड, नारायण कदम, बाळासाहेब पोटे, मोराती जाधव, शिवहरी पोटे, नितीश चव्हाण, उपविभागीय अधिकारी ब्रिजेंश पाटील, गट विकास अधिकारी आर.एल. तांगडे, तालुका कृषी अधिकारी एल.जी.कांबळे, कार्यकारी अभियंता व्हि.एम.डोगळीकर, उप अभियंता एल.डी.देवकर, आर.टी बोनगे, श्री. डाखोरे, श्री. पाटील आदींची उपस्थिती होती.
            यावेळी पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की,  शासन दर्जेदार रस्त्यांसाठी सातत्याने प्रयत्नशिल असून जिल्ह्यासह मतदारसंघातील एकही गाव डांबरी  व पक्क्या रस्त्यापासून वंचित राहणार नाही.  राज्यासह जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून शेती व पिण्यासाठी पाणी उपलब्ध करुन देण्यात शासन यशस्वी झाले असून येणाऱ्या काळात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून अधिक गतीने कामे करुन पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब न् थेंब अडविण्यात येणारअसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            जिल्ह्यातील विद्युत विकासावर भर देण्यात येत असून जिल्ह्यात नवीन 33 के.व्ही., 132 के.व्ही., 220 के.व्ही ची स्टेशनबरोबरच नवीन 1 हजार 500 नवीन ट्रान्सफार्मर बसविण्यात येणार असून यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातील जनता व शेतकऱ्यांना योग्य दाबाने वीज पुरवठा होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
            दीड वर्षामध्ये पर्यावरण मंत्रालयासह इतर सर्व आवश्यक अशा परवानग्या मिळविण्यात येऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये नुकताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे जलपुजन वभूमिपुजन करण्यात आले असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन सातत्याने सकारात्मक निर्णय घेत असून दुष्काळी परिस्थितीमध्ये नापिकीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या पीकाची नुकसान भरपाई, दुष्काळी अनुदान, पीकविमा रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली असून येणाऱ्या काळातही शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

***-***


Friday 23 December 2016

शेतकऱ्यांनी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याची गरज - पालकमंत्री बबनराव लोणीकर



जालना, दि. 23 – राज्याच्या अर्थसंकल्पात शेतीविकासासाठी शासनाने 25 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून शासन शेतकऱ्यांच्या विकासासाठी अनेकविध योजना राबवित असून शेतकऱ्यांनी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
            कृषि उत्पन्न बाजार समिती, मंठा येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना पालकमंत्री श्री लोणीकर बोलत होते.
            यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष कैलासबापू बोराडे, कल्याणबापू खरात, गोपाळराव बोराडे, भाऊसाहेब कदम, मदनलाल शिंगे, गणेशराव खवणे, राजेश मोरे, दारासिंग चव्हाण, अशोक वायाळ, महादेव बाहेकर, सोपानराव खारवणे, पंजाब पुणेकर, राजेभाऊ बोंगाडे, बी.डी. पवार, अंकुशअप्पा बोराडे, बाळासाहेब मोरे, पंबाजराव केंधळे, अंकुश कदम, अंकुशराव अवचार, बाबुराव शहाणे, प्रदीप बोराडे, पंबाजराव बोराडे, शंतनु काकडे, अच्युत डोईफोडे, काशिनाथ बोराडे, गणेश बोराडे, सतीष निर्वळ, राधाकिसन बोराडे, नारायणदवणे, संजय सरवदे, संभाजी खंदारे, बालाजी मोरे, सोनाजीराव बोराडे, कल्याणराव खरात, संजय गायकवाड, समाजभुषण गायकवाड, माऊली शेजुळ, शिवाजी आबा खंदारे, विष्णुपंत खोडके, अनुसयाबाई राठोड, तहसिलदार रवींद्र राठोड, कृषी विद्यापीठ परभणी बी.डी. पवार, महाबीजचे व्यवस्थापक जे.आर. खोकड आदींची उपस्थिती होती.
            यावेळी पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात बदलत्या हवामानानुसार शेती करण्याची गरज आहे. कृषिक्षेत्रामध्ये नवनवीन संशोधने होत आहेत. कमी पाण्यावर व कमी वेळात अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांची तसेच देशी वाणांच्या निर्मितीवर भर देण्यात येत आहे.  कृषि विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी ही माहिती जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन द्यावी.  जेणेकरुन शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये मुबलक प्रमाणात उत्पन्न होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. 
            शेतकऱ्यांच्या शेतीला मुबलक व शाश्वत पाणी, वीज देण्यासाठी  प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगत  राज्य शासनाच्या शेतकऱ्यांसाठी अनेकविध येाजना आहेत.  या योजना प्रत्येक गावापर्यंत पोहोचून त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
            शेतीला शाश्वत व मुबलक प्रमाणात पाणी मिळण्यासाठी जलयुक्त शिवार ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे. गेल्या दोन वर्षापासून राज्यासह जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली असून जालना जिल्ह्यात 60 कोटी रुपये खर्चून नद्यांचे खोलीकरण, रुंदीकरण, गाळ काढणे, नालाबंडीग यासारख्या कामांबरोबरच 500 बंधारे बांधण्यात आले आहेत. या बंधाऱ्यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा संचय झाला आहे.   जलयुक्त शिवार अभियानाची कामे अधिक गतीने व्हावीत यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून 13 पोकलॅन मशिन्स खरेदी करण्यात आल्या आहे.  या मशिन्समुळे वर्षभर प्रत्येक गावात समानरितीने काम करणे शक्य होणार असल्याचे सांगून नागरिकांनीही लोकसभागातून अशा प्रकारची कामे हाती घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
            पंतप्रधान सिचाई योजनेमध्ये लोअर दुधना प्रकल्पाचा समावेश व्हावा यासाठी आपण व्यक्तीश मंत्रालयीन स्तरावर प्रयत्न केल्याने मराठवाड्यातील केवळ लोअर दुधनाचा या योजनेत समावेश करण्यात आला.  या योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून 605 कोटी रुपंयाचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यापैकी 452 कोटी रुपये प्रशासनाला प्राप्त झाले आहेत.  या निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमीनीचा मावेजा देण्याबरोबरच अनेकविध विकास कामे करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
       मराठवाडयातील 40 हजार लोकांना रोजगार मिळवून देण्याबरोबर शेतकऱ्यांच्या विकासात भर घालणारा सीडपार्क जालना येथे उभारण्यासाठी मंत्रीमंडळाने औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीत नुकतीच मंजुरी दिली आहे.  या सीडपार्कच्या माध्यमातून वर्षाला 600 कोटी रुपयांची उलाढाल होणार असून याचा फायदा बि-बियाणे कंपन्यांसह बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.  त्याचबरोबर शेतकरी तसेच गोरगरीब व सर्वसामान्यांच्या पाल्यांना उच्चशिक्षण मिळावे यासाठी जालना परिसरात 200 एकरवर रसायन तंत्रज्ञान संस्थेचे उपकेंद्रासही मंजुरी दिली असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी गोपाळराव बोराडे, तालुका कृषि अधिकारी श्री आमळे, सहाय्यक उपनिबंधक श्रीमती शहा यांचीही समयोचित भाषणे झाली.
            मंठा जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेकविध उपक्रम राबवून त्यांना दिलासा देण्याचे काम केल्याबद्दल संस्थेचा पालकमंत्री महोदयांनी गौरवही केला.             कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार तसेच दीपप्रज्वलनाने करण्यात आली.  यावेळी मार्केट कमेटीच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या भुईकाटा व धान्यचाळणी यंत्राचे उदघाटनही मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्यास पदाधिकारी, अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
***-***




Thursday 22 December 2016

धुळे जिल्हा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला बंदी रमेश आसाराम नाथभजन फरार



जालना, दि. 22 – धुळे जिल्हा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला मु.पो. हातोडी ता घनसावंगी जि. जालना येथील बंदी रमेश आसाराम नाथभजन हा 4 जुलै, 2011 रोजी संचित व अभिवचन रजेवर होता.  दि. 30 डिसेंबर, 2011 रोजी सदरील बंदी कारागृहात स्वत:हून हजर होणे आवश्यक होते.  परंतू सदरील बंदी 30 डिसेंबर, 2011 पासून फरार झालेला आहे. या बंदयाविरुद्ध कलम 224 भा.द.वि. नुसार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असल्याचे अधीक्षक, जिल्हा कारागृह वर्ग-1, धुळे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
***-***

ग्रामीण भागाच्या विकासासाठी राज्य शासन प्रयत्नशिल – पालकमंत्री बबनराव लोणीकर



जालना, दि. 22 –  ग्रामीण भागाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या रस्ते, पाणी, वीज यासारख्या बाबी प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी  राज्य शासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
            पांगरी गोसावी येथे राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे उदघाटन तसेच पांगरी गोसावी- नांगरतास-गोरखुश्वर मंदिर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण, दलित वस्तीमधील सिमेंट रस्ता तसेच जिल्हा परिषद शाळेच्या बांधकाम अशा एकूण एक कोटी 5 लक्ष रुपयांच्या कामाचे उदघाटन पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
            व्यासपीठावर शहाजी राक्षे, हरिराम माने, भाऊसाहेब कदम, विठ्ठलगिरी महाराज, मदनलाल शिंगे, बी.डी. पवार, गणेशराव खवणे, सुनिल कुलकर्णी,  राजेश मोरे, दारासिंग चव्हाण, दत्ताराव चव्हाण, अशोक वायाळ, अशोकअप्पा सोनटक्के, महादेव बाहेकर, सोपानराव खारवणे, विठ्ठलराव काळे, श्रीराम जाधव, अमरसिंह राठोड, पंजाब पुणेकर, राजेभाऊ बोंगाडे, श्रीराम राठोड, भास्कर राठोड, गोविंद गेमाराठोड, शिवाजी नाना,  सरपंच महेश पवार,  उपसरपंच दिगांबर चव्हाण, भिमराव जाधव, सुधाकर चव्हाण, रावसाहेब राठोड, वैजनाथ टेकाळे, महेश पवार, राम चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, रामेश्वर चव्हाण, कल्याण चव्हाण, नवनाथ देशमुख, तहसीलदार श्री गायकवाड, कार्यकारी अभियंता श्री डाकोरे, उपअभियंता श्री चव्हाण आदींची उपस्थिती होती.
            भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी संपूर्ण भारत स्वच्छ करण्याचे स्वप्न उराशी बाळगले असून हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य शासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगत पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, देशात महाराष्ट्र राज्य स्वच्छता अभियानामध्ये प्रथम क्रमांकावर आहे.  राज्यातील 45 तालुके व  1 हजार ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत.  देशातील 10 जिल्हे हे ओडीएफ झाले असून त्यापैकी पाच जिल्हे हे महाराष्ट्रातील आहेत.  राज्यातील प्रत्येक नागरिकाला शौचालय उपलब्ध व्हावे यासाठी राज्य शासनामार्फत 12 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत असून प्रत्येकाने याचा लाभ घ्यावा.   परतूर तालुका येत्या 1 जानेवारीपर्यंत हागणदारीमुक्त करण्याचा आपण संकल्प केला असून संपूर्ण जालना जिल्हाही येत्या काळात हागणदारीमुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी केले.
            शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन सातत्याने सकारात्मक निर्णय घेत असून दुष्काळी परिस्थितीमध्ये नापिकीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या पीकाची नुकसान भरपाई, दुष्काळी अनुदान, पीकविमा रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली असून येणाऱ्या काळातही शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
            जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा विकासात महत्वाचा भूमिका बजावणाऱ्या रस्ते विकासाला शासनाने प्राधान्य दिले असून या रस्त्यांच्या कामासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.   येणाऱ्या काळात जिल्ह्यातील एकही गाव पक्क्या  व डांबरी रस्त्यापासून वंचित राहणार नसल्याची ग्वाहीही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी दिली.
            शेतकऱ्यांच्या शेतीला पाण्याबरोबरच वीज मिळण्याबरोबरच वीजेचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघावा यासाठी 220 के.व्ही.चे 3 संच  33 के.व्ही. चे 39 तर  व 132 के.व्ही. चे एक विद्युत केंद्राबरोबरच  जिल्ह्यात नवीन 1 हजार 500 ट्रान्सफार्मर आणि 12 हजार 900 शेतीपंपाना वीजजोडणीचे काम प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
            मुंबईजवळच्या अरबी समुद्रात भव्यदिव्य अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाच्या जलपूजन व भूमिपूजन कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये       दि. 24 डिसेंबर, 2016 रोजी होत आहे.  या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील नद्यांचे पवित्र जल व तीर्थक्षेत्रांची माती घेऊन जाणार असल्याचे सांगत जिल्ह्यातील नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहनही पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी यावेळी केले.
            दरम्यान पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते 30 लक्ष रुपये किमतीच्या बाबई ते चितळीपुतळी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण, 27 लक्ष रुपये किंमतीच्या दहिफळ भोगाने रस्ता मजबुतीकरण व ग्रामपंचायत कार्यालय, 20 लक्ष रुपये किंमतीच्या वाघाडी येथील रस्ता डांबरीकरण, 45 लक्ष रुपये किंमतीच्या जयपुर-नायगाव-खोराडसांगवी ते प्रजिमा 13-रस्ता-प्रजिमा 26 रस्त्याची सुधारणा, 45 लक्ष रुपये किंमतीच्या जयपुर-नायगाव-खोराडसांगवी रस्त्याची सुधारणा करणे, 20 लक्ष रुपये किंमतीच्या प्रजिमा-13 ते पेवा ईजीमा 127 रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण, 25 लक्ष रुपये किंमतीच्या सिमेंट बंधारा व नळडोह ते किर्तापुर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामांचा शुभारंभही करण्यात आला.
***-***





जिल्हा, तालुका न्यायालयाचा व जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसरातील क्षेत्र शांतता परिसर म्हणून घोषित



जालना,दि.22 – शिवाजी जोंधळे जिल्हादंडाधिकारी जालना यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (एन) व कलम 131 अन्वये प्राप्त झालेल्या शक्तीचा वापर करुन तालुका न्यायालय परिसर व जिल्हा व सत्र न्यायालय परिसर जालना व जिल्हाधिकारी कार्यालय, परिसर जालना येथील आजुबाजूचा 200 मीटर परिसरातील क्षेत्र शांतता परिसर (Silence Zone) म्हणून घोषीत केला असल्याचे पत्रकाद्वारे कळविले आहे.
***-***