Friday 18 May 2018

जालना महोत्सवानिमित्त शहरात शोभायात्रा संपन्न







       जालना, दि. 18 –  जालना शहरामध्ये 18 ते 22 मे दरम्यान जालना महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन या महोत्सवाच्या अनुषंगाने शहरामध्ये आज शुक्रवार दि. 18 मे रोजी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. या शोभायात्रेची सुरुवात मस्तगड येथील मम्मादेवी मंदिर येथे  राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आली.  ही शोभायात्रा मुथा बिल्डिंग, महावीरचौक, मामाचौक, वीर सावरकर चौक, फुलबाजार, नेहरुरोड, काद्राबाद, मंगळबाजार मार्गे जाऊन शिवाजी चौक येथे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन शोभायात्रा विसर्जित करण्यात आली.   
शोभायात्रेमध्ये विविध वेशभुषेमधील स्थानिक कलावंतांसह भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला. यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी हातात टाळ, वीणा घेत अभंग गाऊन या शोभायात्रेमध्ये सहभाग नोंदवत उपस्थितांचा उत्साह वाढवून या जालना महोत्सवामध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले.  
यावेळी घनश्याम गोयल, सुभाष देविदान, उमेश पंचारिया, विरेंद्र धोका,अकलंक मिश्रीकोटकर, भावेश पटेल, मनिष तावरावाला, सुनिल पाचमा, डॉ. दीपक अग्रवाल, डॉ. नीता पंकज जैन, डॉ. संजय पुरी, राजेश शहा, प्राजक्ता पाटील, गोपाल गोयल, अर्जून गेही, ह.भ.प. रमेश महाराज वाघ, विठ्ठल महाराज  यांच्यासह जिल्ह्याच्या विविध भागातून आलेली  वारकरी मंडळी व विविध कलावंतांची तसेच शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी व नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

Thursday 17 May 2018

जालना महोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवा राज्य व देशपातळीवर नावलौकिक मिळवलेल्या जिल्ह्यातील कलावंतांचा गुणगौरव करणार -- पालकमंत्री बबनराव लोणीकर




        जालना, दि. 17 –  जालना शहरामध्ये 18 ते 22 मे दरम्यान जालना महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  हा महोत्सव यशस्वीरित्या तसेच सुरळीतपणे पार पाडून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी महोत्सवादरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी पोलीस प्रशासनास दिले.     
            जालना महोत्सव 2018 च्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री   श्री लोणीकर बोलत होते.
            यावेळी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, घनश्याम गोयल, सुभाष देविदान, उमेश पंचारिया, विरेंद्र धोका,अकलंक मिश्रीकोटकर, भावेश पटेल, मनिष तावरावाला, सुनिल पाचमा, डॉ. दीपक अग्रवाल, डॉ. नीता पंकज जैन, डॉ. संजय पुरी, राजेश शहा, प्राजक्ता पाटील, गोपाल गोयल, अर्जून गेही, सुरेश केसापुरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की,  जालना शहरात आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवामध्ये अनेक सिनेकलाकार तसेच राज्यातील महत्वाचे व्यक्ती कार्यक्रमास उपस्थित राहणार असुन कार्यक्रमास जिल्ह्यासह राज्यातून नागरिकांची उपस्थिती राहणार आहे.  त्यामुळे या कार्यक्रमादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ती काळजी घेऊन चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ताणतणावापासून मुक्तता मिळावी व जिल्ह्यातील कलाकारांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा हा या कार्यक्रमामागचा मुख्य हेतू आहे.  जालना महोत्सवामध्ये स्थानिक कलावंताना एक हक्काचे व्यासपीठ मिळणार असुन या माध्यमातुन त्यांना आपली कला सादर करता येणार आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातुन एक आपलेपणानाची भावना या कार्यक्रमातून समाजामध्ये दृढ व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करत हा महोत्सव यशस्वी होऊन जालना जिल्ह्याचं नाव देशपातळीवर जावा यासाठी पदाधिकारी, अधिकारी तसेच जिल्ह्यातील प्रत्येक समाजाच्या व्यक्तीने या महोत्सवात सहभाग नोंदविण्याचे आवाहन पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी केले.
            जिल्ह्यातील अनेक कलावंतांनी आपल्या कलेच्या माध्यमातुन जिल्ह्याचा देशपातळीवर नावलौकिक केला आहे.  देशपातळीवरील अनेक पुरस्कार या कलावंतांनी पटकावलेले आहेत.  अशा कलाकांराना त्यांची कला जिल्हा वासियांना या महोत्सवाच्या माध्यमातुन पहाता येणार आहे.  तसेच या कलाकारांचा गुणगौरवही या महोत्सवाच्या माध्यमातुन करण्यात येणार आहे. केवळ कलाकारच नाही तर प्रशासनामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांही या महोत्सवामध्ये सत्कार करण्यात येणार असल्याचे सांगत शहरातील उद्योजकांच्या पुढकाराने हा महोत्सव होत असुन सुंदर अशा महोत्सवाच्या आयोजनाबद्दल त्यांनी महोत्सव आयोजन समितीचे अभिनंदही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी केले.
            राज्यमंत्री श्री खोतकर म्हणाले की, मागील अनेक वर्षाच्या नंतर जालना शहरामध्ये अशा प्रकारच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असुन जिल्हावासियांसाठी ही एक मेजवानी ठरणार आहे. महोत्सवादरम्यान स्वच्छतेची जबाबदारी नगरपालिका प्रशासनाने चोखपणे पार पाडण्याबरोबरच अखंडित वीज पुरवठा राहण्यासाठी विद्युत विभागाने योग्य ती दक्षता घ्यावी.  तसेच महोत्सवाच्या ठिकाणी नागरिकांना सहजपणे पोहोचता यावे यासाठी एस.टी. महामंडळाने बसेसची सोय करण्याची सुचनाही राज्यमंत्री श्री खोतकर यांनी यावेळी केली.
            जालना महोत्सव 2018 यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याची ग्वाही देत महोत्सवादरम्यान शांतता व सुव्यवस्था राहण्यासाठी पोलीस प्रशासनाने दक्षता घेण्याचे निर्देश देऊन या महोत्सवात जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहनही राज्यमंत्री श्री खोतकर यांनी यावेळी केले.
            यावेळी विरेंद धोका यांनी 18 ते 22 मे दरम्यान घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली.  बैठकीस जालना महोत्सव 2018 समितीचे सर्व पदाधिकाऱ्यांसह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

“4 वर्षे भारताच्या नवनिर्माणाची सर्वांची साथ: सर्वांचा विकास” लोकराज्यच्या विशेषांकाचे प्रकाशन




            जालना, दि. 17 - 4 वर्षे भारताच्या नवनिर्माणाची सर्वांची साथ : सर्वांचा विकास माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने  मे चा  विशेषांक तयार करण्यात आला आहे. या विशेषांकाचे प्रकाशन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर तसेच राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले.
            यावेळी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर, घनश्याम गोयल, सुभाष देविदान, उमेश पंचारिया, विरेंद्र धोका,अकलंक मिश्रीकोटकर, भावेश पटेल, मनिष तावरावाला, सुनिल पाचमा, डॉ. दीपक अग्रवाल, डॉ. नीता पंकज जैन, डॉ. संजय पुरी, राजेश शहा, प्राजक्ता पाटील, गोपाल गोयल, अर्जून गेही, सुरेश केसापुरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Wednesday 16 May 2018

शेतकऱ्यांशी केंद्रीय पथकाने साधला संवाद

जालना, दि, 16 :- बोंडअळीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या भोकरदन व जाफ्राबाद तालुक्यातील शेतकऱ्यांशी आज दिनांक 16 मे रोजी केंद्रीय पथकाने प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधत झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.
केंद्रीय पथकामध्ये केंद्रीय सह सचिव अश्वीनी कुमार, आर.डी. देशपांडे,  के. डब्ल्यु. देशकर,  चाहत सिंग, एम.जी. टेंभुर्णे, ए. मुरलीधरन, डॉ. डी.के. श्रीवास्तव यांचा समावेश होता. यावेळी कृषी आयुक्त एस.पी. सिंह, प्र. जिल्हाधिकारी पी.बी. खपले, प्र.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उर्मिला चिखले, तहसीलदार योगिता कोल्हे आदींची उपस्थिती होती.
पथकाने सर्व प्रथम भोकरदन तालुक्यातील बाभुळगाव व सिपोरा बाजार या गावांना भेट दिली. त्यानंतर जाफ्राबाद तालुकयातील बोरगाव या गावाला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. भोकरदन, जाफ्राबाद भागात कापसाची  मोठया प्रमाणात लागवड करण्यात येते. परंतु बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापूस पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती तिन्ही गावातील शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकाला दिली. यावेळी पथकातील सदस्यांनी गावातील शेतकऱ्यांकडून त्यांनी किती एकरावर कापसाची लागवड केली होती,  किती उत्पन्न झाले, कापूस  पिकाला बोंड अळीचा प्रादुर्भाव कधी झाला, कोणत्या औषधाची फवारणी केली, विमा उतरवला होता काय आदी बाबींची माहिती जाणून घेतली.
---*-*-*-*-*-*-*

Monday 14 May 2018

जालना महोत्सव 2018 च्या मंडपाची पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडून पाहणी





            जालना, दि. 14 - जालना शहरात 18 ते 22 मे, 2018 दरम्यान जालना महोत्सव 2018 आयोजित करण्यात आला असुन या महोत्सवाच्या मंडपाची  पाहणी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी  कलश सीड्स मैदान, मंठा चौफुली, रिंग रोड, जालना  येथे प्रत्यक्ष भेट देऊन केली.
            यावेळी घनश्याम गोयल, विरंद्रप्रकाश धोका, रमेशचंद्र बंग, नरेंद्र मित्तल, सुभाषचंद्र देविदान, सुदेश करवा, उमेश पंचारिया-गौड, बंडूभाऊ मिश्रीकोटकर, भावेश पटेल, मनिष तवारावाला, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, मुख्यधिकारी   संतोष खांडेकर, वास्तुशास्त्र श्रीमती राठी आदींची उपस्थिती होती.




जालना महोत्सव 2018 च्या मंडपाचे
पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते पुजन

            जालना, दि. 14 - जालना शहरात 18 ते 22 मे, 2018 दरम्यान जालना महोत्सव 2018 आयोजित करण्यात आला असुन या महोत्सवाच्या मंडपाचे पुजन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते कलश सीड्स मैदान, मंठा चौफुली, रिंग रोड, जालना  येथे करण्यात आले.
            यावेळी घनश्याम गोयल, विरंद्रप्रकाश धोका, रमेशचंद्र बंग, नरेंद्र मित्तल, सुभाषचंद्र देविदान, सुदेश करवा, उमेश पंचारिया-गौड, बंडूभाऊ मिश्रीकोटकर, भावेश पटेल, मनिष तवारावाला, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, मुख्यधिकारी   संतोष खांडेकर, वास्तुशास्त्र श्रीमती राठी आदींची उपस्थिती होती.


राष्ट्रीय रुरबन मिशनच्या माध्यमातुन
आष्टीसह 16 गावांत करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांना मोठ्या प्रमाणात गती द्या                                             
                                            - पालकमंत्री बबनराव लोणीकर
        * कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करा.
 * कामात हयगय अथवा दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार
            जालना, दि. 14 –राष्ट्रीय रुरबन मिशन हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.  या प्रकल्पांतर्गत परतूर तालुक्यातील  आष्टीसह परिसरातील १६ गावांची निवड करण्यात आली असुन यासाठी १८५ कोटी  रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून 16 गावात करण्यात येणारी कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याबरोबरच या कामांना गती देण्याचे निर्देश देऊन काम वेळेत न करणाऱ्या तसेच कामात हयगय अथवा दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.
            राष्ट्रीय रुरबन योजनेसंदर्भात आष्टी ता. परतूर येथील मोरेश्वर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री  श्री. लोणीकर बोलत होते.
            व्यासपीठावर मदनलाल सिंगी, सुदामराव प्रधान, प्रदीप ढवळे, सरपंच श्री सादेक, रामप्रसाद थोरात, अर्जुन राठोड, रंगनाथ येवले, सिद्धेश्वर सोळंके, सुरेशराव सोळंके, पांडूआबा सोळंके, माणिकराव वाघमारे, बाबाराव थोरात, गणतपराव सातपुते, विष्णु शहाणे,अमोल जोशी, संपत टकले, प्रभारी जिल्हाधिकारी पी.बी. खपले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुरेश बेदमुथा, मजिप्राचे कार्यकारी अभियंता अजय सिंग, श्री डाकोरे आदींची उपस्थिती होती.
            श्री. लोणीकर म्हणाले, परतूर तालुक्यातील आष्टीसह अकोली, आनंदगाव, ब्राम्हणवाडी, सुरुमगाव, ढोकमाळ तांडा, फुलेवाडी, पळसी, हास्तुरतांडा, लिखित पिंप्री, लोणी खुर्द, कनकवाडी, परतवाडी रायगव्हाण, सातारा वाहेगाव व वाहेगाव सातारा या गावांचा राष्ट्रीय रुरबन रुरबन योजनेमध्ये समावेश करण्यात येऊन 185 कोटी रुपयांच्या निधीच्या माध्यमातून 16 गावातील नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येऊन नागरिकांचे जीवनमान उंचावण्यावर भर देण्यात येत आहे.  राष्ट्रीय रुरबन अंतर्गत आष्टी-पांडेपोखरी रस्त्यावर राज्यातील पहिली शेतकऱ्यांची मिनी एमआयडीसी उभारण्यात येत आहे.  या मिनी एमआयडीसीच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना तसेच महिलांच्या बचतगटांना छोटछोटे उद्योग उभे करुन देण्यात येणार आहेत.  शेतकऱ्यांनी पीकवलेल्या मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचा यामध्ये समावेश करण्यात आला असुन यामुळे शेतकऱ्यांनी पीकवलेल्या मालाला चांगला भावही या माध्यमातुन मिळणार असल्याचे पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            राष्ट्रीय रुरबनअंतर्गत 16 गावात विविध विकास कामे करण्यात येत असुन विद्युत विभागाचा आढावा घेताना पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, 16 गावात वीज सुरळीत होण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.  आवश्यक त्या ठिकाणी पोल बदलण्याबरोबरच केबलही टाकण्यात येत असुन या कामांचा गती देण्यात यावी. शेतकऱ्यांसाठी स्थापन करण्यात येत असलेल्या मिनी एमआयडीसीला अखंडित वीजेचा पुरवठा होण्यासाठी एक्सप्रेस फिडरचे अंदाजपत्रकही सादर करण्याच्या सुचना विद्युत विभागाला यावेळी पालकमंत्री    श्री लोणीकर यांनी दिल्या.
            रुरबनमध्ये समावेश करण्यात आलेल्या 16 गावात सांडपाणी तसेच घनकचरा व्यवस्थापनचा प्रकल्प करण्यात येणार असुन शिवणी या गावामध्ये सांडपाणी व्यवस्थापनाचा उत्कृष्ट असे काम करण्यात आले असल्याचे उदाहरण देत प्रकल्पामध्ये समाविष्ट गावातसुद्धा शिवणीप्रमाणेच कामे करण्याची सुचना देत ज्या ज्या ठिकाणची कामे प्रलंबित असतील ती येत्या 20 दिवसांच्या आत पूर्ण करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
            ग्रामपंचायत कार्यालय उभारणीच्या कामाचा आढावा घेताना पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, लोणी, आंबा व सिरसगाव येथे ग्रामपंचायतीचे सर्व सोयींनीयुक्त व अद्यावत अशी कार्यालये तयार करण्यात आलेली आहेत.  रुरबन मिशनमधील 16 गावात ग्रामपंचायतींची कार्यालयेही गुणवत्तापूर्ण व चांगल्या दर्जाची झाली पाहिजेत.  यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला असुन ग्रामपंचायतीनेही त्यांच्याकडे उपलब्ध असलेला निधी कार्यालयाच्या उभारणीसाठी वापरण्याची सुचनाही त्यांनी यावेळी केली.
            शेतकऱ्यांच्या शेतीसह सर्वसामान्यांना शाश्वत पाणी पुरवठा व्हावा यादृष्टीकोनातुन जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे.  या योजनेंतर्गत जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली असुन राष्ट्रीय रुरबन मिशनमध्ये निवड झालेल्या 16 गावांमध्येही जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नद्यांचे खोलीकरण, रुंदीकरणाबरोबरच जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात करण्याचे निर्देश देत काकडा या गावात असलेल्या पाच खदानीमध्ये केवळ 15 लक्ष रुपयांच्या निधीमधून प्रत्येकी 20 फुटांपर्यंत पाणी साठवण्यात आले आहे.  त्याचप्रमाणे 16 गावातही जलसंधारणाच्या कामाबरोबरच खदानीमधून पाणी साठविण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याच्या सुचना त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. 
            जमीनीची धूप थांबून पावसाचे प्रमाण वाढविण्यासाठी शासनामार्फत वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला असुन या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.  आष्टीसह 16 गावांमध्येही वृक्ष लागवड करण्यात यावी.  केवळ वृक्षांची लागवड करुन चालणार नाही तर लागवड केलेले वृक्ष जगली पाहिजेत यासाठीही आवश्यक ती काळजी घेण्याचे निर्देश पालकमंत्री श्री लोणीकर यांनी संबंधित विभागाला दिले.
             नळाद्वारे पाणी पुरवठा, स्वच्छता गाव अंतर्गत गटारे जोडणी, गाव अंतर्गत रस्ते जोडणी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, एल पी जी गॅस कनेक्शन, कौशल्य विकास प्रशिक्षण, स्टोरेज आणि गोदाम व्यवस्था, शाळा सुधारणा,  उच्च शिक्षण सुविधा, आरोग्याच्या सुविधा दुग्ध विकास, सामाजिक न्याय, मस्त्य व्यवसाय विकास, भूजल, प्रधान मंत्री आवास यॊजना (ग्रामीण), स्मशानभूमी, अंगणवाडी, बसस्थानक उभारणी आदी विषयांचाही उपस्थित अधिकाऱ्यांकडून आढावा घेत  ही सर्व कामे येत्या 20 दिवसात सुरु करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
            परतूर तालुक्यातील आष्टीसह 16 गावांच्या विकासासाठी सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे व एकदिलाने काम करण्याचे आवाहन करत या योजनेच्या धर्तीवर मतदारसंघात विकास कामे करुन शहरीकरणाचे स्वरुप देणार असुन केलेल्या कामांची गुणवत्ता पथकामार्फत तसेच आपण स्वत: पहाणी करणार असुन पहाणीदरम्यान कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण नसल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
            पिण्याच्या पाण्याचे कोणतेही स्त्रोत नसलेल्या टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा, यासाठी संबंधीत गावाच्या सरपंचांनी आपले प्रस्ताव  सादर केल्यानंतर संबंधित गावाला तातडीने टँकरने पाणी पुरवठा करण्याच्या सूचना देत जिल्ह्यात दिनांक १3 मे २०१८ अखेर 60 गावे व ०८ वाड्यासाठी १९ शासकीय तसेच 52 खाजगी अशा एकूण 71 टँकरद्वारे टंचाईग्रस्त गावात पाणी पुरवठा सुरु आहे . २१4 विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. याशिवाय नळयोजना दुरुस्तीचे 233 कामे, तात्पुरत्या पुरक नळ योजनेची 20 कामे मंजूर असल्याचे सांगत पाणी टंचाई निर्माण होणार नाही यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेण्याच्या सुचना करत टंचाई निवारणार्थ करावयाच्या उपाययोजनेचे प्रस्ताव प्राप्त होताच टंचाई आराखड्यानुसार तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश देऊन टंचाई कामात हयगय केल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिला.
            बैठकीस जिल्हा परिषद, सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, 16 गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
*******






Friday 11 May 2018

बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारचा दिलासा, 3400 कोटींची मदत जाहीर: जालना जिल्ह्यासाठी २६३ कोटी मंजूर - पालकमंत्री बबनराव लोणीकर







                जालना दि.11- जालना  जिल्ह्यात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याने हजारो हेक्टरमधील कपाशी पिकांचे अतोनात नुकसान झाले होते  बोंड अळीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. खरीप हंगामात बोंडअळी आणि तुडतुडे रोग प्रभावीत पिकांच्या शेतक-यांना  राज्य शासनाने  मदत देण्याबाबातचा शासन निर्णय जारी  केला असून  यानुसार ३ हजार ४८४ कोटी रुपये रक्कम शेतक-यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. 3 समान हप्त्यात ही मदत शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे जालना जिल्ह्यासाठी २६३ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून यापैकी रु ७३.४३ लक्ष निधी प्राप्त झाला असून निधी वाटपाचे आदेश काढण्यात आले आहे व उर्वरित रक्कम  लवकरच  शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्यात येणार असल्याची  माहिती  पालकमंत्री  बबनराव लोणीकर यांनी दिली 
जिल्ह्यात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर महाराष्ट्रात  सर्वप्रथम पालकमंत्री श्री लोणीकर यांनी  नोव्हेंबर २०१७  मध्ये  जांबसमर्थ ता. घनसावंगी, आष्टी ता. परतूर आणि पिंपरखेडा ता. मंठा येथे शेतात प्रत्यक्ष जाऊन या नुकसानीची पाहणी केली होती. एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही,  प्रत्येक शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन पंचनामे करण्याचे आदेश शासकीय यंत्रणेला दिले  बोंडअळीच्या प्रादुर्भावाने नुकसानी संदर्भात जिल्ह्यात सुरु असलेलया पंचनाम्याबाबतचा सविस्तर आढावा पालकमंत्री श्री लोणीकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांकडून वेळोवेळी घेऊन पाठपुरावा केला  विभागीय आयुक्तांना नुकसान भरपाईसाठी मागणी प्रस्ताव  शासनाकडे पाठविण्याचे निर्देश दिले 
जालना जिल्ह्यात ३७२४१४  हेक्टर क्षेत्रावतील ५२८८७३ शेतकऱ्यांचे  कपाशी पिकांचे कमी अधिक प्रमाणात अतोनात नुकसान झाले होते  यासंदर्भात पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी नोव्हेंबर 2017 मध्येच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून त्यांना बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीच्या नुकसानीसंदर्भात माहिती दिली होती. शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाल्यामुळे तात्काळ नुकसानीचे पंचनामे करुन शेतकर्‍यांना मदत द्यावी अशी मागणी पालकमंत्री श्री. लोणीकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती तसेच मंत्रिमंडळ बैठकीत सुद्धा याविषयी वेळोवेळी पुढाकार घेतला जालन्यासह राज्याच्या विविध जिल्ह्यातून या नुकसानीच्या तक्रारी प्राप्त झाल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंदर्भात तातडीने दखल घेवून राज्यात सर्वत्र नुकसानीचे पंचनामे  करण्याचे आदेश दिले. जिल्ह्यासाठी अनुदान मागणी तालुकानिहाय पुढील प्रमाणे आहे.
जालना -३५.११ कोटी , बदनापूर-२६.३० कोटी ,भोकरदन- ४६.४५ कोटी ,जाफ्राबाद -२६.९५ कोटी ,परतूर- २९.१० कोटी, मंठा -१४.३१ कोटी, अंबड- ४७.३१ कोटी, घनसावनगी -३८.१२ कोटी
-*-*-*-*-*-*


Monday 7 May 2018

176 गावांच्या वॉटरग्रीड योजनेंतर्गत पाईनलाईन अंथरण्याची अपूर्ण कामे पावसाळयापूर्वी पूर्ण करा कामात हयगय अथवा दिरंगाई करणाऱ्यावर सक्त कारवाईचा इशारा - पालकमंत्री बबनराव लोणीकर



            जालना, दि.7 –  जालना, परतूर व मंठा तालुक्यातील 176 गावांना स्वच्छ व शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी वॉटरग्रीड योजना राबविण्यात येत असुन या योजनेंतर्गत पाईप अंथरण्याची कामे कामे येत्या पावसाळयापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देत या कामात हयगय अथवा दिरंगाई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध सक्त कारवाई करण्याचा इशारा राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिला.
            वॉटरग्रीड योजनेच्या कामासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री लोणीकर बोलत होते.
            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता श्री लोलापोड,  ठाणे येथील गुणवत्ता पथकाचे अधीक्षक अभियंता मनीषा पलांडे, नागपूर येथील यांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता किशोर शिंगरु, अधीक्षक अभियंता अजय सिंग, गुणवत्ता पथकाचे कार्यकारी अभियंता  श्री भालेराव, निम्नदुधना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता श्री बनसोडे, परतूरचे उप विभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, उप अभियंता श्री कानडे, श्री पाथरवट, श्री कोलने,      श्री बंगाळे, श्री बागडे, श्री गवई, सार्वजनिक बांधकाम विभाग परतूरचे उप अभियंता श्री खोसे,           मंठा येथील महावितरणचे सहाय्यक अभियंता श्री खंडागळे, परतूर येथील श्री देवकर आदींची उपस्थिती होती.




            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, महाराष्ट्रातील पहिला परतूर,मंठा व जालना तालुक्यात समाविष्ट १७६ गावासाठी ग्रीड पद्धतीने पाणी पुरवठ्याचा 234 कोटी रुपयांचा पायलट राबविण्यात येत आहे.  या प्रकल्पाचे 55 टक्के काम पूर्ण झाले असुन येत्या एक वर्षाच्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण करावयाचा आहे.  पावसाळयामध्ये शेतकऱ्यांची मशागतीचे कामे सुरु होत असल्याने पाईपलाईन अंथरण्यासाठी खोदकाम करताना अडचणी येऊ शकतात.  त्यामुळे या प्रकल्पांतर्गत पाईपलाईन अंथरण्याचे काम जुनपूर्वी पूर्ण करण्यात यावे.  या योजनेंतर्गत झालेल्या कामांची तपासणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ठाणे यांच्या गुणवत्ता पथक तसेच उस्मानाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत करण्यात येणार आहे.  गुणवत्ता पथकाकडून दर्शविण्यात येणाऱ्या त्रुटींची पूर्तता तातडीने करण्याचे निर्देश देत ही कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्णच झाली पाहिजेत, अशा सुचनाही पालकमंत्री      श्री लोणीकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
            ग्रीड योजना येत्या एक वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असुन  या योजनेच्या पुर्णत्वानंतर ही गावे टंचाईमुक्त होऊन या सर्व गावांना मुबलक व शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे शक्य होणार असून या गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघेल त्यामुळे टंचाईग्रस्त कालावधी मध्ये कराव्या लागणाऱ्या विविध उपाययोजनांच्या खर्चात शासनाची फार मोठी बचत होणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            वॉटरग्रीड योजनेसाठी आवश्यक असलेल्या विद्युत जोडणी तसेच विद्युत उपकेंद्र उभारणीसाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास संपूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश देत विद्युत व यांत्रिकीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याची मजिप्रा व महावितरणच्या अभियंत्यांनी प्रत्यक्ष फॅक्टरीमध्ये जाऊन पहाणी करावी व योग्य साहित्यच या कामासाठी वापरण्याचे निर्देश देत या योजनेसाठी दरमहा 70 लक्ष रुपयांची वीज लागणार आहे.  या योजनेसाठी सोलार प्लँट बसवल्यास दरमहा 18 लक्ष रुपयांची वीज या माध्यमातून प्राप्त होणार असल्याने वीज बिलामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी सांगितले.  अधीक्षक अभियंता, गुणवत्ता पथक यांनी पुरवठा विहिर, शुद्धीकरण केंद्र व संतुलन टाकी येथे सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याची सुचना केली.  पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यास तातडीने मान्यता देऊन या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले.  नागपूर येथील पेरी अर्बन ही 234 कोटी रुपयांची योजना दोन वर्षाच्या कालावधीत पूर्ण करुन कार्यान्वित करण्यात आली.  केवळ दोन वर्षाच्या कालावधीत या योजनेचे भूमिपुजन करुन उदघाटन केल्याबद्दल नागपूर येथे झालेल्या समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी मजीप्रा व खात्याचे मंत्री म्हणून माझे कौतुक केले होते. यापासून प्रेरणा घेऊन त्याचप्रमाणे ही योजनाही विहित वेळेत पूर्ण करण्याची सुचना त्यांनी यावेळी केली.
            वॉटरग्रीड योजनेच्या स्थापत्य कामाचे सादरीकरण कार्यकारी अभियंता अजय सिंग यांनी केले तर या यांत्रिकी व विद्युत कामांची निविदा अंतर्गत समाविष्ठ असलेल्या कामांचे सादरीकरणात  महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नागपुरचे कार्यकारी अभियंता किशोर शिंगरु यांनी वॉटर हॅमर कंट्रोल उपकरणे, स्वयंचलित यंत्रणेमुळे हि हेड वर्क , जलशुद्धीकरण केंद्र व वाटूर फाटा येथील पंपा साठी बसविण्यात येणार असून हि सर्व पम्पिंग मशिनरी कॉम्प्युटर च्या अत्याधुनिक सॉफ्टवेयर  (SCADA ) द्वारे जलशुद्धीकरण केंद्र येथूनच चालू बंद, नियंत्रित करता येणार असुन या मुळे देखभाल दुरुस्ती करीता मनुष्यबळ कमी लागणार आहे. फ्लोमीटरमुळे वाया जाणारे पाण्याचे परिमाण कळणार असुन यामुळे पाणी तुटीवर योग्य उपाययोजना करणे शक्य होणार आहे.  सोलार प्लँटवर तयार झालेली वीज मीटर द्वारे  महावितरण च्या मेन लाईन ला जोडून   नेट मीटरिंग जोडण्यात येणार आहे त्यामुळे सोलर द्वारे तयार होणारी वीजेचे युनिट  हे महावितरण च्या विद्युत देयकातून कमी होणार असल्याचे सांगत  एक्सप्रेस फिडरबाबतही श्री शिंगरु यांनी सविस्तर अशी माहिती दिली.
            दरम्यान जालना तालुक्यातील पाष्टा येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे वारस श्रीमती मीना उत्तम काळे यांना 1 लक्ष रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती.  त्यापैकी 70 हजार रुपये श्रीमती काळे यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले असुन उर्वरित 30 हजार रुपयांचा धनादेश पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.
*******


Friday 4 May 2018




सुधारित बातमी
वृत्त क्रमांक:-280                                                                                             दिनांक:- 4-5-2018
उद्योगाचे  भावी मॅग्नेट
औरंगाबाद आणि जालना राहणार -- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जालना, दि. 4 –देशातील सर्वोत्तम इंडस्ट्रीयल पार्क म्हणून शेंद्रा-बिडकीन उदयास येत आहे.  तसेच जालना येथे ड्रायपोर्टची उभारणी करण्यात येत असुन या ड्रायपोर्टमुळे मराठवाड्यातील उद्योजकांना त्यांचा माल सहजपणे आयात व निर्यात करता येणार आहे.  तसेच समृद्धी महामार्गाच्या माध्यमातुन हा माल कमी वेळेत जेएनपीटी पर्यंत पोहोचण्यास मदत होऊन यामुळे उद्योजकांच्या आर्थिक उत्पन्नातही भर पडणार असल्याने उद्योगाचे भावी मॅग्नेट औरंगाबाद आणि जालना राहणार असल्याचे प्रतिपादन  मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस  फडणवीस यांनी केले.
सिरसवाडी येथे रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या उपकेंद्राचे भूमीपुजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी वृंदावन हॉल येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात विद्यार्थ्यांशीसंवाद साधताना ते बोलत होते.
व्यासपीठावर राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन, दुग्धविकास, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, खासदार रावसाहेब दानवे, कुलगुरु डॉ. जे.डी. यादव, आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, नगराध्यक्षा श्रीमती संगिता गोरंट्याल, माजी आमदार कैलास गोरंट्याल, अरविंद चव्हाण, रामेश्वर भांदरगे, भास्कर दानवे, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, प्रभारी जिल्हाधिकारीपी.बी. खपले आदींची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की, भविष्यातील भारत व प्रगत राष्ट्राच्या निर्मितीचा विचार करता असताना महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील मागास भागांचा जोपर्यंत विकास होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा विकास होणार नाही.  प्रगतीमध्ये मानव संसाधनाचे मोठे महत्व असुन त्याशिवाय विकास होणे शक्य नाही. पुणेसारख्या शहरामध्ये मोठ-मोठ्या शैक्षणिक संस्था आल्या व त्या माध्यमातुन मानव संसाधनांची निर्मिती होऊन त्यानंतरच पुणे शहर हे विद्यानगरीचे उद्योगनगरी झाले. आपल्या जीवनात आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आवश्यक असलेली प्रयोगशिलता निर्माण करण्याची ताकद रसायन तंत्रज्ञानामध्ये असुन या विद्यालयातून उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेला एकही विद्यार्थी रोजगारापासून वंचित राहिलेला नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
रसायन तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये मानव संसाधनांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे.  मानव संसाधनांचा मागणीएवढा पुरवठाही करता येत नसुन या क्षेत्रात मानव संसाधन तयार झाल्यास अनेक मोठ्या उद्योगांना आकर्षित करता येण शक्य आहे. रसायन तंत्रज्ञान संस्था ही केवळ रोजगार देणारी संस्था नसून या संस्थेच्या माध्यमातुन अनेक उद्योजक व संशोधक निर्माण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
मराठवाड्याच्या विकासावर भर देण्यात येत असुन लातुरसारख्या जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार अभियानाच्यामाध्यमातुन पाण्याची व्यवस्था निर्माण केली असुन महाराष्ट्रातला सर्वात मोठा रेल्वे कोचचा कारखाना लातुरमध्ये उभारण्यात येत आहे.  शेती, उद्योग क्षेत्रामध्ये येणाऱ्या काळात अमुलाग्र बदल पहावयास मिळणार असुन जागतिक बँकेच्या सहाय्याने 6 हजार कोटी रुपयांचा नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प 4 हजार गावात राबविण्यात येत आहे. जालन्यामध्ये सीडपार्कची उभारणी करण्यात येत असुन या माध्यमातुन मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होणार आहे.  रसायन तंत्रज्ञानाचाही या सीडपार्कला मोठा फायदा होणार आहे. जालना जिल्ह्याच्या विकासामध्ये निधीची कुठलीच कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाहीही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी दिली.
पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, जालना वासियांच्या आयुष्यातील आजचा दिवस हा अत्यंत आनंदाचा आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या, गोरगरीबांच्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी रसायन तंत्रज्ञान विद्यालय उभारण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे ते जालना जिल्ह्याला मंजुर झाले आहे. जालना जिल्ह्याच्या विकासासाठी 5 हजार 334 कोटी, रस्ते विकासासाठी 7 हजार कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असुन या माध्यमातुन अनेकविध कामे करण्यात येत आहेत.  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातुन जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 900 कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली असुन 600 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.  जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातुन जिल्ह्यात 500 बंधाऱ्याची उभारणी करण्याबरोबरच नद्यांचु पुनरुज्जीवनही करण्यात आले असुन मराठवाड्यातील जनतेला शुद्ध व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यासाठी मराठवाडा वॉटरग्रीड योजना साकारण्यात येत असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
राज्यमंत्री श्री खोतकर म्हणाले की, रसायन तंत्रज्ञानचे उपकेंद्र हे जालना येथे होत असल्याने जालनेकरांसाठी हा सौभाग्याचा क्षण आहे. मागील काळात मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या माध्यमातुन जालना जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला असुन  जालना शहराच्या भूमिगत गटार योजनेचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
खासदार रावसाहेब दानवे म्हणाले की, सिरसवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या रसायन तंत्रज्ञानच्या उपकेंद्रासाठी 203 एकर जागा उपलब्ध करुन देण्यात आली असुन यासाठी 397 कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर 121 शिक्षक व 128 शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदेही मंजूर करण्यात आली आहेत.  विद्यार्थ्यांना आता उच्च शिक्षणासाठी मुंबई येथे जाण्याची गरज नसून जालना येथे रसायन तंत्रज्ञान उपकेंद्राच्या माध्यमातुन दर्जेदार व रोजगार मिळवून देणारे शिक्षण घेता येणार आहे. रसायन तंत्रज्ञान संस्थेने अनेक यशस्वी उद्योजक निर्माण केलेले असुन मराठवाड्यासह जालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या उद्योजकांचा आदर्श घेऊन आपणही केवळ रोजगार मिळविण्यासाठी नाही तर उद्योजक बनण्याच्या दिशेने प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी रसायन तंत्रज्ञान संस्थेची माहिती असलेल्या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, उद्योजक, विद्यार्थी, विद्यार्थीनी, पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
-*-*-*-

उद्योगाचे प्रगतीचे भावी मॅग्नेट औरंगाबाद आणि जालना राहणार -- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


जालना, दि. 4 –देशातील सर्वोत्तम इंडस्ट्रीयल पार्क म्हणून शेंद्रा-बिडकीन उदयास येत आहे.  तसेच जालना येथे ड्रायपोर्टची उभारणी करण्यात येत असुन या ड्रायपोर्टमुळे मराठवाड्यातील उद्योजकांना त्यांचा माल सहजपणे आयात व निर्यात करता येणार आहे.  तसेच समृद्धी महामार्गाच्या माध्यमातुन हा माल कमी वेळेत जेएनपीटी पर्यंत पोहोचण्यास मदत होऊन यामुळे उद्योजकांच्या आर्थिक उत्पन्नातही भर पडणार असल्याने उद्योगाचे भावी मॅग्नेट औरंगाबाद आणि जालना राहणार असल्याचे प्रतिपादन  मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस  फडणवीस यांनी केले.
सिरसवाडी येथे रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या उपकेंद्राचे भूमीपुजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी वृंदावन हॉल येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात विद्यार्थ्यांशीसंवाद साधताना ते बोलत होते.
व्यासपीठावर राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन, दुग्धविकास, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, खासदार रावसाहेब दानवे, कुलगुरु डॉ. जे.डी. यादव, आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, नगराध्यक्षा श्रीमती संगिता गोरंट्याल, माजी आमदार कैलास गोरंट्याल, अरविंद चव्हाण, रामेश्वर भांदरगे, भास्कर दानवे, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, प्रभारी जिल्हाधिकारीपी.बी. खपले आदींची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की, भविष्यातील भारत व प्रगत राष्ट्राच्या निर्मितीचा विचार करता असताना महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील मागास भागांचा जोपर्यंत विकास होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा विकास होणार नाही.  प्रगतीमध्ये मानव संसाधनाचे मोठे महत्व असुन त्याशिवाय विकास होणे शक्य नाही. पुणेसारख्या शहरामध्ये मोठ-मोठ्या शैक्षणिक संस्था आल्या व त्या माध्यमातुन मानव संसाधनांची निर्मिती होऊन त्यानंतरच पुणे शहर हे विद्यानगरीचे उद्योगनगरी झाले. आपल्या जीवनात आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आवश्यक असलेली प्रयोगशिलता निर्माण करण्याची ताकद रसायन तंत्रज्ञानामध्ये असुन या विद्यालयातून उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेला एकही विद्यार्थी रोजगारापासून वंचित राहिलेला नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
रसायन तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये मानव संसाधनांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे.  मानव संसाधनांचा मागणीएवढा पुरवठाही करता येत नसुन या क्षेत्रात मानव संसाधन तयार झाल्यास अनेक मोठ्या उद्योगांना आकर्षित करता येण शक्य आहे. रसायन तंत्रज्ञान संस्था ही केवळ रोजगार देणारी संस्था नसून या संस्थेच्या माध्यमातुन अनेक उद्योजक व संशोधक निर्माण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
मराठवाड्याच्या विकासावर भर देण्यात येत असुन लातुरसारख्या जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार अभियानाच्यामाध्यमातुन पाण्याची व्यवस्था निर्माण केली असुन महाराष्ट्रातला सर्वात मोठा रेल्वे कोचचा कारखाना लातुरमध्ये उभारण्यात येत आहे.  शेती, उद्योग क्षेत्रामध्ये येणाऱ्या काळात अमुलाग्र बदल पहावयास मिळणार असुन जागतिक बँकेच्या सहाय्याने 6 हजार कोटी रुपयांचा नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प 4 हजार गावात राबविण्यात येत आहे. जालन्यामध्ये सीडपार्कची उभारणी करण्यात येत असुन या माध्यमातुन मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होणार आहे.  रसायन तंत्रज्ञानाचाही या सीडपार्कला मोठा फायदा होणार आहे. जालना जिल्ह्याच्या विकासामध्ये निधीची कुठलीच कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाहीही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी दिली.
पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, जालना वासियांच्या आयुष्यातील आजचा दिवस हा अत्यंत आनंदाचा आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या, गोरगरीबांच्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी रसायन तंत्रज्ञान विद्यालय उभारण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे ते जालना जिल्ह्याला मंजुर झाले आहे. जालना जिल्ह्याच्या विकासासाठी 5 हजार 334 कोटी, रस्ते विकासासाठी 7 हजार कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असुन या माध्यमातुन अनेकविध कामे करण्यात येत आहेत.  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातुन जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 900 कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली असुन 600 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.  जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातुन जिल्ह्यात 500 बंधाऱ्याची उभारणी करण्याबरोबरच नद्यांचु पुनरुज्जीवनही करण्यात आले असुन मराठवाड्यातील जनतेला शुद्ध व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यासाठी मराठवाडा वॉटरग्रीड योजना साकारण्यात येत असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
राज्यमंत्री श्री खोतकर म्हणाले की, रसायन तंत्रज्ञानचे उपकेंद्र हे जालना येथे होत असल्याने जालनेकरांसाठी हा सौभाग्याचा क्षण आहे. मागील काळात मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या माध्यमातुन जालना जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला असुन  जालना शहराच्या भूमिगत गटार योजनेचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
खासदार रावसाहेब दानवे म्हणाले की, सिरसवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या रसायन तंत्रज्ञानच्या उपकेंद्रासाठी 203 एकर जागा उपलब्ध करुन देण्यात आली असुन यासाठी 397 कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर 121 शिक्षक व 128 शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदेही मंजूर करण्यात आली आहेत.  विद्यार्थ्यांना आता उच्च शिक्षणासाठी मुंबई येथे जाण्याची गरज नसून जालना येथे रसायन तंत्रज्ञान उपकेंद्राच्या माध्यमातुन दर्जेदार व रोजगार मिळवून देणारे शिक्षण घेता येणार आहे. रसायन तंत्रज्ञान संस्थेने अनेक यशस्वी उद्योजक निर्माण केलेले असुन मराठवाड्यासह जालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या उद्योजकांचा आदर्श घेऊन आपणही केवळ रोजगार मिळविण्यासाठी नाही तर उद्योजक बनण्याच्या दिशेने प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी रसायन तंत्रज्ञान संस्थेची माहिती असलेल्या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, उद्योजक, विद्यार्थी, विद्यार्थीनी, पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
-*-*-*-