Thursday 17 May 2018

“4 वर्षे भारताच्या नवनिर्माणाची सर्वांची साथ: सर्वांचा विकास” लोकराज्यच्या विशेषांकाचे प्रकाशन




            जालना, दि. 17 - 4 वर्षे भारताच्या नवनिर्माणाची सर्वांची साथ : सर्वांचा विकास माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने  मे चा  विशेषांक तयार करण्यात आला आहे. या विशेषांकाचे प्रकाशन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर तसेच राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले.
            यावेळी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर, घनश्याम गोयल, सुभाष देविदान, उमेश पंचारिया, विरेंद्र धोका,अकलंक मिश्रीकोटकर, भावेश पटेल, मनिष तावरावाला, सुनिल पाचमा, डॉ. दीपक अग्रवाल, डॉ. नीता पंकज जैन, डॉ. संजय पुरी, राजेश शहा, प्राजक्ता पाटील, गोपाल गोयल, अर्जून गेही, सुरेश केसापुरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment