Tuesday 28 August 2018

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न



जालना, दि. 28 –  जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हापुरवठा अधिकारी राजीव नंदकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
            बैठकीस प्रा. डॉ. रेणुका भावसार, संध्या संजय देठे, भाग्यश्री जगताप, मोहन नेहेरे, श्री गवारे, मिठू किसनराव आगलावे, माधवराव पात्रे, रवींदग गोल्डे, मीरा आरगडे, शेख वसीम तंबोळी, बी.एम. देशमुख, संदीप काबरा, विजय जाधव, विमलताई आगलावे, जी.व्ही. बागल, चंद्रमणी शंकरराव खरात, मोहन इंगळे, महावितरणचे किरण म्हेत्रे, बीएसएनएलचे गोपाल शं पेम्बार्ती, भावना आफळे,   आदींची उपस्थिती होती.
            यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी श्री नंदकर म्हणाले की, जालना जिल्ह्यात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेमार्फत स्वस्त धानय्‍ दुकान, गॅस एजन्सी, पेट्रोल पंप, दुकाने यांची तपासणी करण्यात येणार असुन ग्राहक व त्यांचे संरक्षण याबाबत सप्टेंबर महिन्यात कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असुन या जिल्हा ग्राहक संरक्षणपरिषदेच्या माध्यमातुन ग्राहकांचे प्रश्न तडीस लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही श्री नंदकर यांनी यावेळी सांगितले.            
            जालना शहरामध्ये रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे.  वाहनधारकांसह नागरिकांना या रस्त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत असुन या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. दारिद्रय रेषेखाली देण्यात येणाऱ्या धान्याबाबत नागरिकांना माहिती होत नसुन धान्याच्या दराची माहिती असलेले फलक प्रत्येक रेशन दुकानावर लावण्यात यावेत. बदनापूर शहर हे हायवे लगत असलेले गाव असुन या ठिकाणी लोकसख्ंयाही मोठ्या प्रमाणात आहे.  परंतू या ठिकाणी सार्वजनिक शौचालयांचा अभाव असुन यामुळे अनेकवेळा रस्त्यावर नागरिका शौचास बसलेले दिसतात.  त्या ठिकाणी तातडीने सार्वजनिक शौचालयांची उभारणी करण्यात यावी. प्रत्येक पेट्रोल पंपावर मोफत हवा देण्यासाठी मशिन्स बसवलेल्या आहेत. परंतू या मशिन्स निकामी असुन याचा वापर होताना दिसत नाही.  या मशिन्स कार्यान्वित करण्यासाठी सर्व पेट्रोलपंप धारकांना सुचना देण्याबरोबरच आधारकार्डची नोंदणी करण्यासाठी महा-ई सेवा केंद्रामार्फत नागरिकांकडून अतिरिक्त पैशाची मागणी करण्यात येते.  याबाबतही योग्य ती कार्यवाही करावी आदी मागण्या यावेळी सदस्यांनी नोंदवल्या. 
            यावेळी राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवर राज्यपालांद्वारे अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल डॉ.प्रा. रेणुका भावसार यांचा जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव नंदकर यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
*******

Thursday 23 August 2018

महाराष्ट्र भूजल (विकास व्यवस्थापन) नियम 2018 च्या मसुदा नियमांवर जिल्ह्यातील पदाधिकारी व जनतेनी हरकती व सुचना पाठवाव्यात - पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचे आवाहन



            जालना, दि. 23 – पाणी हे राष्ट्रीय संपत्ती आहे.  मराठवाड्यासह राज्यातील काही भागातील जनतेला सातत्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत असुन उपलब्ध पाण्याच्या वापराचे योग्य नियोजन करुन अतिशोषित पाणलोट क्षेत्रात भविष्यातील पाणीसंकट टाळण्यासाठी शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. महाराष्ट्र भूजल (विकास व्यवस्थापन) नियम 2018 च्या मसुदा नियमांवर जिल्ह्यातील पदाधिकारी व जनतेनी हरकती व सुचना पाठविण्याचे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणकर यांनी केले.
            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) नियम 2018 कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री लोणीकर बोलत होते.   
            व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, उपाध्यक्ष सतीष टोपे, सदस्य श्री चव्हाण, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्या, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, पुणे येथील भूजल सर्वेक्षण विभागाचे अतिरिक्त संचालक आय.आय शहा, औरंगाबाद येथील उपसंचालक पी.एल. साळवे, वरिष्ठ भू-वैज्ञानिक श्री मेश्राम, कनिष्ठ भू-वैज्ञानिक डॉ.शरद गायकवाड, उप अभियंता श्री सगदेव आदींची उपस्थिती होती.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की,  निसर्गाच्या लहरीपणामुळे मराठवाड्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागला.  लातुरसारख्या शहराला रेल्वेने पाण्याचा पुरवठा करण्यात आला तर राज्यात टँकरने पाण्याचा पुरवठा करण्यात आला.  पडणाऱ्या पावसाचे पाणी वाहुन जाण्याने तसेच पाण्याच्या अतिउपश्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी अत्यंत खोल गेलेली आहे.  पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवण्याबरोबरच तो अडवण्यासाठी राज्यासह जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबवून शाश्वत पाणी साठे निर्मितीवर भर देण्यात येत असला तरी पाणी वापरासंबंधात काही नियम असणे गरजेचे आहे.  या बाबींचा विचार करुन महाराष्ट्र भूजल (विकास व्यवस्थापन) नियम 2018 च्या मसुदा नियमावली तयार करण्यात आली असुन यासाठी जनतेकडून अभिप्राय व सुचना मागविण्यात येत आहेत.  राज्यात या मसुद्याच्या माहितीसाठी प्रत्येक जिल्ह्यात कार्यशाळा घेण्यात आल्या असुन अशा प्रकारच्या कार्यशाळा नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरावर घेऊन समाजामध्ये पाण्याच्या वापराबाबत माहिती करुन देण्याचे आवाहनही पालकमंत्री        श्री लोणीकर यांनी यावेळी केले.
            85 लक्ष एवढी लोकसंख्या असलेल्या व पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असलेल्या इस्त्राईल देशाचा मराठवाडा वॉटरग्रीडच्या अनुषंगाने नुकताच दौरा केला असल्याचे सांगत पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की,  इस्त्राईल देशात इतर देशांच्या तुलनेत पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे.  या देशामध्ये पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब् न थेंबाचे वापराचे अत्यंत काटेकोरपणे नियोजन करण्यात आले असुन पिण्यासाठी, शेतीसाठी व उद्योगासाठी वापरण्यात येणाऱ्या पाणी वापरासाठी अत्यंत कडक असे नियम आहेत.  पाण्याच्या एका थेंबाचाही या देशामध्ये अपव्यय होत नसल्यानेच या देशाची प्रगती झाल्याचे दिसुन येत असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत मराठवाड्यात शेतीपिकासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात येतो.  जास्त पाणी लागणाऱ्या ऊसासारखी पीके मोठ्या प्रमाणात घेतली जातात.  तसेच पडणारे पाणी कालवा, चारीच्या माध्यमातुन शेतीला देण्यात येते. शेतकऱ्यांना कमी पाण्यावर अधिक उत्पादन देणाऱ्या पीकांची लागवड करण्यासाठी कृषि विभागाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याची गरज असल्याचे सांगत प्रत्येकाने आपल्या घराच्या छतावर पडणाऱ्या पावसाचे पुनर्भरण करण्याची गरज असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे म्हणाले की, दैनंदिन जीवनामध्ये पिण्याचे पाणी, शेती व उद्योगासाठी पाण्याची मोठी मागणी असते.  उपलब्ध पाण्याचा साठा  व पाण्याची असलेल्या मागणीनुसार पुरवठा करणे सोयीस्कर व्हावे यासाठी अधिनियमाची नियमावली तयार करण्यात आली असुन 31 ऑगस्टपर्यंत जनतेनी मसुद्यासंदर्भात त्यांचे असलेले अभिप्राय, सुचना शासनाकडे सादर करण्यात याव्यात. तसेच अधिनियमांतर्गत शासनाच्या प्रत्येक विभागाची असलेली जबाबदारी व नियमावलीची माहिती होण्यासाठी या कार्यशाळेचे आयेाजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनीही नियमावलीबाबत उपयुक्त अशा सुचना मांडल्या.
            सर्वप्रथम माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी श्रद्धांजली अर्पण करुन कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली.  कार्यशाळेत वरिष्ठ भू-वैज्ञानिक श्री मेश्राम यांनी महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) नियम 2018 बाबत पॉवर पाँईंटच्या माध्यमातुन उपस्थितांना माहिती दिली.
            कार्यशाळेस पदाधिकारी, अधिकारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*******
           



Thursday 16 August 2018

बदनापूर तालुक्यातील बोंडअळीने प्रादुर्भावग्रस्त गावांची राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडून पहाणी



            जालना, दि. 16 – बोंडअळीने प्रादुर्भावग्रस्त झालेल्या बदनापुर तालुक्यातील मात्रेवाडी व सेलगाव येथील शेतपिकाची राज्याचे कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतावर प्रत्यक्ष जाऊन पिकाची पहाणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधुन झालेल्या बोंडअळीच्या प्रादुर्भावाची माहिती घेतली.
            यावेळी आमदार नारायण कुचे, लक्ष्मण मोहिते, गजानन राजबिडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  व्ही.एस. माईनकर आदींची उपस्थिती होती.
            राज्यमंत्री श्री खोत यांनी सर्वप्रथम  सेलगाव येथील शेतकरी हरिभाऊ अंभोरे यांच्या शेतामध्ये जाऊन पिकावर प्रादुर्भाव झालेल्या बोंडअळीची पहाणी करुन कापसाची लागवड कधी करण्यात आली होती.  बोंडअळीच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या आदी माहिती जाणून घेत मात्रेवाडी येथील शेतकरी शिवाजी रामराव महाडीक यांच्या शेतात जाऊन तेथील कापूस पिकाची पहाणी केली.   
            यावेळी राज्यमंत्री श्री खोत म्हणाले की, जालना जिल्ह्यात 113 गावात 20 हजार 200 हेक्टर क्षेत्राला बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे.  बोंडअळीच्या प्रादुर्भावाची कारणे शोधण्यात आली असुन यावर उपाययोजना करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कामगंध सापळे उपलब्ध करुन देण्याबरोबरच लिंबोळी अर्क, किटकनाशकेही अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.  पेरणीपूर्वी राज्यात शेतकरी संवाद अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यात आल्याची माहिती देत या अभियानाच्या माध्यमातुन शेतकऱ्यांनी कोणत्या कंपनीचे बियाणे वापरले आहे, पेरणी केव्हा केली आहे व कोणती काळजी घेतली आहे ही माहिती सदरील अभियानादरम्यान कृषि अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घेतली आहे.  राज्यात व्हिलेज, कॉलेज व नॉलेज हे अभियान राबविण्यात येत असुन कृषि अधिकाऱ्यांसह कृषि विद्यापीठातील शेवटच्या वर्षातील विद्यार्थी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना एकत्रितपणे मदत करत असल्याचेही राज्यमंत्री श्री खोत यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी रवी इचे, दत्तराव खराबे, कैलास डोंबे,संतोष खराबे, शिवनाथ जाधव, जितु आलेडकर, यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
            तत्पूर्वी राज्यमंत्री श्री खोत यांनी वाटुर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांशीही संवाद साधला.
राज्यमंत्री श्री खोत यांनी घेतला आढावा
            बदनापूर येथील कृषि संशोधन केंद्र येथे कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांकडून बोंडअळीसंदर्भात केलेल्या उपाययोजनांचा आढावा राज्यमंत्री श्री खोत यांनी घेतला.
            यावेळी आमदार नारायण कुचे, पं.सं. सदस्य श्री शिंदे,  डॉ. जहागीरदार, प्रभारी अधिकारी एम.बी. पाटील, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी व्ही.एस.माईनकर यांच्यासह सर्व तालुका कृषि अधिकारी उपस्थित होते.
            राज्यमंत्री श्री खोत म्हणाले की, मात्रेवाडी तसेच सेलगाव येथे कापूस पिकाची पहाणी केली असता कापसाच्या पिकामध्ये आंतरपीकांचा आभाव आढळून आला.  जिल्ह्यात किती शेतकऱ्यांनी कापूस पिकामध्ये आंतरपीक घेतले, नॉनबीटीची लागवड केली आहे काय याबाबत सर्वेक्षण करण्याच्या सुचना देत तालुका कृषि अधिकाऱ्यांना दर आठवड्याला गावभेटीचे उद्दिष्ट देण्यात येते.  तालुका कृषि अधिकाऱ्यांनी गावभेटीची तारीख व वेळ असलेले बोर्ड प्रत्येक गावात लावण्याचे निर्देश देऊन जे अधिकारी, कर्मचारी कामात हयगय अथवा कुचराई करतील अशांवर कारवाईचे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.  मागेल त्याला शेततळे योजनेचा आढावा घेऊन शेततळयाचे जिओटॅगिंगचे काम वेगाने करण्याचे निर्देशही श्री खोत यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.  दरम्यान बदनापूर येथील कृषि महाविद्यालयास भेट देऊन तेथील कामकाजाची पहाणी करत विद्यार्थींनीशीही संवाद साधला.
*******






जालना जिल्ह्यात सरासरी 11.80 मि.मी. पावसाची नोंद


जालना, दि. 16   - जिल्ह्यात दि. 15 ऑगस्ट ,  2018  रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात सरासरी  11.80   मि.मी एवढ्या एकूण पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदाच्या एकूण पावसाची आहे.
            जालना-  10.38 (264.73 ), बदनापूर-  1.60 (280.80 ), भोकरदन- 7.88 (195.14 ),  जाफ्राबाद 3.60  (162.60 ), परतूर-  23.20 (278.00 ), मंठा- 32.00  (304.75 ), अंबड- 3.71 (191.00) घनसावंगी-  12.00 (206.57 ) मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 688.21 मि.मी. एवढी असून 1 जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी   235.45   मि.मी. एवढा पाऊस झाला आहे.
-*-*-*-*-*-

पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचा जालना जिल्हा दौरा


जालना, दि.16 -  राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असुन त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
            शनिवार दि. 18  ऑगस्ट, 2018  रोजी  सकाळी  9.00  वाजता भक्ती  निवास, जालना येथून मोटारीने केंधळी ता. मंठा येथे प्रयाण सकाळी 10.00 वाजता केंधळी ता.मंठा येथे आगमन   33 के.व्ही. सब स्टेशन व श्री. गणेश मंदीर  सभा मंडप भुमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती ( स्थळ-केंधळी ता. मंठा), सकाळी 11.45 वाजता  केंधळी येथून मोटारीने तहसील कार्यालय, मंठाकडे प्रयाण, दुपारी 12.00 वाजता तहसील कार्यालय,मंठा  येथे आगमन व बरबडा, खोराडसावंगी, पाटोदा, लिंबे वडगाव येथील तलावातील संपादीत जमीनीचा मावेजा वाटप कार्यक्रमास जमीनीचा मावेजा वाटप कार्यक्रमाची उपस्थिती ( स्थळ- तहसील कार्यालय,मंठा ) सोईनुसार भक्ती निवास , जालना कडे प्रयाण व मुक्काम.
-*-*-*-*-*-*

Tuesday 14 August 2018

युवा माहिती दूत उपक्रमात युवापिढीने हिरीरीने सहभाग नोंदवावा जालना जिल्हा युवा माहिती दूत उपक्रमात राज्यात अव्वल यावा - पालकमंत्री बबनराव लोणीकर


जालना, दि. 15 – केंद्र व राज्य शासनामार्फत सर्वसामान्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.  या योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत असले तरी युवापिढीने या योजनांची माहिती घेऊन त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी युवा माहिती दूत उपक्रमामध्ये अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
            युनिसेफच्या सहयोगाने राज्य शासनाचा उच्च शिक्षण विभागआणि तंत्र शिक्षण विभाग यांच्या प्रत्यक्ष सहभागाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने‘युवा माहिती दूत’ हा उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात करण्यात आला.
            याप्रसंगी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्या, रामेश्वर भांदरगे, उद्योजगपती घनश्यामसेठ गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, माहिती सहाय्यक अमोल महाजन, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक सोमिनाथ खाडे, अनुलोम संस्थेचे सुरेश पोहार आदींची उपस्थिती होती.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, केंद्र व राज्य शासन गोरगरीबांच्या कल्याणासाठी अनेकविध योजना राबविते.  या योजनांची माहिती राज्याच्या माहिती व जनसंपर्क खात्याच्यावतीने वृत्तपत्रे, ईलेक्ट्रॉनिक माध्यम, सोशल माध्यमाद्वारे पोहोचविण्यात येते.  शासनाच्या योजनांची माहिती अधिकगतीने  शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी युवा पिढीने पुढे येण्याची गरज असुन शासनाच्यावतीने राज्यात राबविण्यात येत असलेल्या युवा माहिती दूत उपक्रमात जिल्ह्यातील विद्यार्थी, विद्यार्थीनींनी हिरिरीने सहभाग नोंदवून शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांना होऊन  या उपक्रमात जालना जिल्हा राज्यात प्रथम येईल यासाठी काम करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात माहिती सहाय्यक अमोल महाजन यांनी  युवा माहिती दूत या उपक्रमाबद्दल सविस्तर अशी माहिती दिली.
            सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते युवा माहिती दूत या उपक्रमाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. तसेच प्रोजेक्टरच्या माध्यमातुन या उपक्रमाची माहिती असलेला व्हिडीओ उपस्थित मान्यवरांना दाखविण्यात आला.
            कार्यक्रमास प्राचार्य डॉ. सुनंदा तिडके, प्रा. सुभाष वाघमारे, प्रा. डॉ. वणंजे, प्रा. डॉ. संतोष देशपांडे, प्रा. मिर्झा शेख, प्रा. डॉ. सुधाकर जाधव, प्रा. देवडे, अनुलोम संस्थेचे संदीप बोंदरवाल, महामित्र गणेश राऊत, सौरभ पंच, अप्पासाहेब चेंडे, अनिल खंदारे यांच्यासह जिल्ह्यातील महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थीनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*******









           

स्वच्छ राज्य, स्वच्छ जिल्हा स्पर्धेत महाराष्ट्र राज्यास प्रथम क्रमांक मिळण्यासाठी एसएसजी ॲपमध्ये अधिकाधिक अभिप्राय नोंदवावेत - पालकमंत्री बबनराव लोणीकर









जालना दि15- जिल्ह्यात 1 लाख 75 हजार वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम करण्यात येऊन केंद्र शासनाच्या बेसलाईन सर्वेक्षणानुसार मराठवाडा विभागात सर्वात प्रथम हागणदारीमुक्त होण्याचा बहुमान जालना जिल्ह्याने प्राप्त केला.  वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम झाले असले तरी जनतेने त्याचा नियमितपणे वापर करावा.  स्वच्छ सर्वेक्षण 2018 अंतर्गत केंद्र शासनाच्या एसएसजी 18 या मोबाईल ॲपमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी अभिप्राय नोंदवून स्वच्छ राज्य, स्वच्छ जिल्हा या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यास स्वच्छतेचा प्रथम क्रमांक मिळवून देण्याचे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले. 
            स्वातंत्र्य दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले.  त्याप्रसंगी जनतेला उद्देशन शुभेच्छा  संदेश देतेवेळी ते बोलत होते.
            यावेळी आमदार राजेश टोपे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, माजी आमदार अरविंद चव्हाण, कैलास गोरंट्याल, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्या, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अपर जिल्हाधिकारी पी.बी. खपले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संदीप पाटील, उप विभागीय अधिकारी केशव नेटके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की,  1 ते 31 ऑगस्ट दरम्यान राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये स्वच्छ सर्वेक्षण 2018 राबविण्यात येत आहे.  राज्यभरातून 340 ते 540 ग्रामपंचायतींची केंद्र शासनाच्यावतीने तपासणी करण्यात येणार येणार असुन ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, बाजाराचे ठिकाणी तसेच धार्मिक व यात्रेच्या ठिकाणी सर्वेक्षण करण्यात येणार आहे.  केंद्र शासनाच्या एसएसजी 18 या मोबाईल ॲपमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी अभिप्राय नोंदवून स्वच्छ राज्य, स्वच्छ जिल्हा या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यास स्वच्छतेचा प्रथम क्रमांक मिळवून देण्याचे आवाहन पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी केले.
जिल्ह्यात जानेवारी, 2018 पासून ई-पॉस मशिनद्वारे आधार पडताळणी करुन जनतेला धान्य वाटप करण्यात येत आहे. -पॉसमुळे धान्य वाटपातील गैर प्रकाराला आळा बसवण्यात येऊन खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत धान्य पोहोचत आहे. जिल्ह्यात 3 लाख लाभार्थ्यांना ई-पॉसच्या माध्यमातुन धान्याचे वाटप करण्यात येत असुन या योजनेमध्ये राज्यात कोल्हापुर जिल्हा प्रथम, नागपूर द्वितीय तर जालना जिल्हा तृतीय क्रमांकावर असल्याबद्दल समाधान व्यक्त करत प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातुन जिल्ह्यातील 1 लाख कुटुंबाना गॅसचे वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे.  त्यापैकी 50 हजार कुटूंबांना केवळ 100 रुपयात गॅसचे वाटप करण्यात आले असुन येणाऱ्या काळात समाजातील गरजू,पात्र व वंचितांना या योजनेतून गॅस उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई, ही देशातील अग्रगण्य संस्था असून मागील ८१ वर्षापासून रसायन तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधन व नाविन्यपूर्ण कार्य करीत आहे. या संस्थेच्या उप केंद्रासाठी मौजे शिरसवाडी, ता.जि.जालना येथील गट नं.132 मधील 200 एकर शासकीय जमिन उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे सुपूर्द करण्यात आली असून या उपकेंद्राच्या कामाचे नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमीपुजन करण्यात आले आहे. सध्या औद्योगिक वसाहती मध्ये भाडे तत्वारील जागेत हे उपकेंद्र सुरु करण्यात आले असुन उपकेंद्रामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशही देण्यात आला आहे. यामुळे मराठवाड्यासह राज्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मोठी सोय झाली असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले. 
            जागतिक बँकेच्या अर्थ सहाय्याने राबविण्यात येणाऱ्या नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पात राज्यातील 15 जिल्ह्यातील 5 हजार 142 गावांची तर जालना जिल्ह्यातील 363 गावांची निवड करण्यात आली असुन प्रथम टप्प्यात जिल्हयातील 67 गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये फळबाग लागवड, संरक्षित शेती, एकात्मिक शेती पद्धती, सुक्ष्म सिंचन, सामुहिक लाभ, मृद व जलसंधारणाची कामे करण्यात येणार असुन या कामांवर तीन वर्षात 295 कोटी 33 लक्ष रुपये खर्च करण्यात येणार आहेत. हवामानात होत असलेल्या  बदलामुळे तसेच निसर्गाच्या लहरीपणामुळे पडणाऱ्या पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे.  या बदलामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये होणाऱ्या उत्पादकतेच्या परिणामाबरोबरच पाणी टंचाई, कृषि उत्पादन वाढीचा घटलेला दर, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांमध्ये पसरलेले नैराश्य तसेच ग्रामीण भागातून शहराकडे होत असलेले स्थलांतर रोखुन शेतकऱ्यांना शाश्वत शेतपिकाच्या उत्पादनासाठी नानाजी देशमुख कृषि संजीवनी हा प्रकल्प अत्यंत उपयोगी ठरेल असा विश्वासही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी व्यक्त केला.  
            मराठवाड्यातील टंचाईची समस्या कायमची सोडविण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना  राबविण्यात येत आहे. यामध्ये गुजरात व तेंलगणा या राज्यासह श्रीलंका व इस्त्राईल या देशाच्या धर्तीवर पिण्याचे पाणी, शेतीसाठी व उद्योगासाठी पाणी यासाठी एकत्रित ग्रीड करण्यात येणार आहे. इस्त्राईल शासनाची राष्ट्रीय कंपनी असलेल्या मेकोरोड या कंपनी बरोबर करार केलेला असून  त्याचा प्रथमिक अहवाल नुकताच  मा. मुख्यमंत्री महोदयांना सादर करण्यात आलेला आहे. मेकोरोड कंपनी मराठवाड्यातील पाण्याचा मास्टर प्लॅन करणार आहे. त्या अनुषंगाने मराठवाड्यातील पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी व उद्योग धंदे  यांची समस्या कायम स्वरुपी सोडविण्यासाठी शासन कटीबध्द असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            सातत्याने निर्माण होणाऱ्या टंचाई परिस्थितीवर मात करुन शाश्वत पाणीसाठे निर्माण करण्यासाठी गेल्या तीन वर्षापासुन राज्यात जलयुक्त शिवार अभियान यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे.  जालना जिल्ह्यात सन 2015-16 मध्ये 212,  2016-17 मध्ये 186 तर 2017-18 मध्ये 149 गावांची निवड करण्यात येऊन 398 गावात जलसंधारणाची 10 हजार 29 कामे पूर्ण  करण्यात आली आहेत.  जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांमुळे जवळपास 93 हजार 639 टी.सी.एम. पाणीसाठा निर्माण झाला आहे. येणाऱ्या काळात जिल्ह्यातील सर्व गावामध्ये हे अभियान यशस्वीरित्या राबवुन जालना जिल्हा टंचाईमुक्त करण्याचा मानस असुन या कामांमध्ये नागरिकांनी अधिकाधिक सहभाग नोंदविण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी केले.  
मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात निवासी वसतिगृह बांधण्यात येणार असुन प्रत्येक जिल्ह्यातील वसतीगृहाच्या बांधकामासाठी ५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. ५०० विदयार्थी क्षमतेची ही वसतिगृहे असून यामध्ये 150 जागा मुलींसाठी राखीव आहेत.  वसतीगृह होईपर्यंत या विद्यार्थ्यांची तात्पुरती सोय शासनाच्या विनावापर असलेल्या इमारतीमध्ये करण्यात येणार आहे.   जालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी शिवाजी पुतळा येथे असलेल्या जुन्या शासकीय विश्रामगृहाच्या ईमारतीमध्ये वसतीगृह सुरु करण्यात येणार आहे. दोन एकरमध्ये असलेल्या विश्रामगृहाच्या जागेमध्ये ८ कक्ष आणि ३१ शासकीय निवासस्थाने आहेत. इमारतीची दुरुस्ती करुन त्याचा वापर विद्यार्थ्यांच्या वसतीगृहासाठी करण्यात येणार आहे. या वसतीगृहामुळे ग्रामीण भागातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
            शेतकऱ्यांना शेती कामासाठी पैशांची निकड भासू नये यासाठी जिल्ह्यातील सर्व गरजू शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप करण्यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकेसह जिल्हा मध्यवर्ती बँकांना सुचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील 27 बँकांच्या 174 शाखेमार्फत 82 हजार 26 शेतकऱ्यांना 534 कोटी 53 लक्ष रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले असुन येत्या 30 ऑगस्टपर्यंत पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सुचना बँकांना देण्यात आल्या आहेत. गत वर्षात नापिकी मुळे नुकसान झालेल्या 5 लाख 64 हजार शेतकऱ्यांना पीकविम्यापोटी 176 कोटी 81 लक्ष एवढ्या रुपयांचे वाटप विविध बँकेच्या माध्यमातुन शेतकऱ्यांच्या खात्यावर करण्यात आले आहे. यावर्षी खातेदारांकडून 9 लाख 39 हजार विमा अर्ज भरुन 32 कोटी 33 लक्ष रुपयांची रक्कम विमा कंपनीकडे जमा करण्यात आली असुन  बोंडअळीने कापसाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई म्हणून शासनाने जालना जिल्ह्यासाठी 275 कोटी 37 लाख             67 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी 186 कोटी एवढी रक्कम विविध बँकेच्या माध्यमातुन शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.    
            छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील 1 लाख 32 हजार 427 लाभार्थ्यांना आज पर्यंत 648 कोटी 33 लक्ष 24 हजार रुपयांचा निधी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. गरजू शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरु राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  
राज्य राखीव पोलीस दलाच्या कार्यालयाची तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची अत्यंत दुरावस्था झालेली होती.  जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्या पोलीसांची निवासस्थाने व कार्यालय सुसज्ज असावीत. यासाठी मंत्रालयीन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. या कामासाठी 192 कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी 557 निवासस्थाने, सुसज्ज समादेशक कार्यालय ईमारत, कंपनी कार्यालय, बिनतारी संदेश कार्यालय, वाहतुक कार्यशाळा, बहुउद्देशिय कार्यालय व क्षेत्रीय कार्यालयाच्या ईमारतीबरोबरच व्यायामशाळा, वाचनालय व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ईमारतीच्या उभारणीचे काम अत्यंत वेगाने सुरु असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            राज्यात घटत चाललेले वनक्षेत्र वाढविण्यासाठी संपूर्ण राज्यात 1 ते 31 जुलै, 2018 या कालावधीत ‘13 कोटी वृक्ष लागवड’ हा कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला.  जालना जिल्ह्याला  या कार्यक्रमांतर्गत 36 लाख 22 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते.  उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजेच 52 लाख 36 हजार वृक्षांची लागवड करण्यात आली असून त्याचे संगोपनही करण्यात येत आहे. 
            वृक्ष लागवड ही केवळ मोहिम न राहता ती एक लोकचळवळ व्हावी यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या घराच्या व  कार्यालयाच्या परिसरात एक तरी वृक्षाचे रोपण करुन त्याचे संगोपन करण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री लोणीकरयांनी यावेळी केले.
             जालना जिल्हा विकासाच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे.   ई-पॉस मशिनद्वारे धान्य वाटपात राज्यात जालना तीसऱ्या क्रमांकावर आहे.  पीकविमा भरुन घेण्यात जालना राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे.  पीककर्ज वाटपात जिल्हा मराठवाड्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मराठवाड्यात हागणदारीमुक्त होण्याचा पहिला मान जालना जिल्ह्याला मिळाला. तुतीच्या लागवडीमध्ये जालना राज्यात तीसरा तर रेशीम कोष उत्पादनात जालना जिल्हा राज्यात  दुसऱ्या क्रमांकावर असुन जिल्ह्याच्या विकासामध्ये सर्वांनी योगदान देण्यात आवाहनही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी केले.
            यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंग गौर यांना राष्ट्रपती पदक प्राप्त झाल्याने पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.  तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँक जालनाच्या सर्व शाखांनी खरीप पीककर्ज 85 टक्के पूर्ण केल्याबद्दल बँकेचे जिल्हा समन्वयक रत्नाकर केसकर वराष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास स्वातंत्र्य सैनिक, पदाधिकारी, अधिकारी, पत्रकार यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Thursday 2 August 2018





शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीची दुरुस्ती करुन
इमारत मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या वसतीगृहासाठी उपलब्ध करुन द्या
                                                  -- पालकमंत्री बबनराव लोणीकर
जालना दि. 2 -  जिल्ह्यातील मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी निवासी वसतीगृहासंदर्भात राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांची शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेऊन शिवाजी पुतळा परिसरात असलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीची दुरुस्ती करुन ही इमारत विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाची उपलब्ध करुन देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, उप विभागीय अधिकारी केशव नेटके, अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुरेश बेदमुथा, तहसिलदार बिपीन पाटील, नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री खांडेकर आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, जालना शहराच्या मध्यभागी जुने शासकीय विश्रामगृह दोन एकर परिसरात असुन या ठिकाणी स्वतंत्र इमारत उपलब्ध असुन  या ठिकाणी आठ कक्ष आहेत.  त्याचबरोबर कर्मचाऱ्यांसाठीचे 32 निवासस्थानेही आहेत.  या ठिकाणी विद्यार्थ्यांची चांगल्या प्रमाणात सोय होणार असुन या ईमारतीची डागडुजी करुन ही इमारत तातडीने वसतीगृहासाठी उपलब्ध करुन देण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
राष्ट्रीय रुरबन मिशनच्या कामाचा पालकमंत्र्यांकडून आढावा
राष्ट्रीय रुरबन मिशनच्या माध्यमातुन परतुर तालुक्यातील  16 गावांचा सर्वांगिण विकास करण्यात येत असुन या योजनेंतर्गत शेतकऱ्यांसाठीची मिनी एमआयडीसीही तयार करण्यात येणार आहे.  शेतकऱ्यांनी पीकविलेल्या मालावर प्रक्रिया करणारे 100 उद्योग या एमआयडीसीमध्ये सुरु करण्यात येणार असुन या विविध कामांचा राज्याचे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते लवकरच शुभारंभ करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
मानवविकास मिशनअंतर्गत जालना जिल्ह्यातील मुलींना शाळेत पोहोचण्यासाठी 56 बसेस शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.  मुलींना शिक्षणासाठी  जाण्या-येण्याची सोय व्हावी यासाठी परतूर तालुक्यातील सात बसेस एस.टी. महामंडळाला उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.  मुलींची संख्या पहाता मंठा व परतूर तालुक्यासाठी प्रत्येकी एक बस आणखी आवश्यक असल्याने या बसेस संदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे शिक्षण विभागाला त्यांनी यावेळी निर्देश दिले.  मतदारसंघातील 200 गावात डांबरी रस्ते तयार करण्यात आलेले असुन आजही अनेक गावात एस.टी. बसच्या फेऱ्या होत नाहीत.  ज्या गावात बससेवा उपलब्ध नसेल त्या गावांना तातडीने बससेवा उपलब्ध करुन देण्याबाबतही एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी सुचना केल्या.

सर्व्हे क्र. 488 येथील विश्रामगृहाचा गैरवापर होत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. यावर आळा घालण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या सुचना देत अशाप्रकारचे गैरप्रकार या ठिकाणी आढळून आल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची तंबीही त्यांनी यावेळी दिली.
बैठकीस संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
तत्पूर्वी पालकमंत्री श्री लोणीकर यांनी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या वसतीगृहासाठी भूविकास बँकेची इमारत, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र तसेच शिवाजी पुतळयाजवळ असलेल्या जुन्या शासकीय विश्रामगृहाची प्रत्यक्ष भेट देऊन पहाणी केली.
यावेळी मंत्री महोदयांसमवेत माजी आमदार अरविंद चव्हाण, भुजंगराव गोरे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्या, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, एन.व्ही. आघाव, तहसिलदार बिपीन पाटील यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे प्रमख अधिकारी उपस्थित होते.
*वृत्त क्रमांक:- 491                                                                                              दिनांक: 2-8-2018

 हदयप्रत्यारोपन शस्रक्रिया यशस्वी होऊन परतलेल्या धनश्री मुजमुलेची
पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी घेतली भेट-
 पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या भेटीने भारावले मुजमुले कुटुंब

            जालना, दि. 2 -   जालना येथील पाच वर्षे वयाच्या धनश्रीवर हदयप्रत्यारोपन शस्रक्रियेसाठी आर्थिक मदत केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख ओमप्रकाश शेटे यांचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी आभार व्यक्त करत  धनश्रीची आज प्रत्यक्ष भेट घेतली.
            जालना येथील सर्वसामान्य कुटुंबातील धनश्री कृष्णा मुजमूले वय 5 वर्ष हिच्यावर दि.22 जुन रोजी मुलुंड (मुंबई) येथील फोर्टिस हॉस्पिटल येथे यशस्वी हदय प्रत्यारोपन शस्रक्रिया झाली. 40 दिवस हॉस्पीटल मध्ये राहिल्यानंतर धनश्री दि.29 जुलै रोजी जालन्यात परतली. आज राज्याचे पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी धनश्रीच्या जालना येथील निवास्थानी भेट देऊन धनश्रीच्या जवळ जाऊन आपुलकीने तीच्या प्रकृतीची विचारपूस केली व ईश्वराकडे धनश्रीच्या सूदृढ आरोग्यासाठी प्रार्थना केली
*******