Saturday 15 July 2017

कौशल्यावर आधारित प्रशिक्षण घेऊन तरुण,तरुणींनी आपले आयुष्य घडवावे - जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे

जालना, दि. 15 – देशासह राज्यात औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणुक होऊन अनेक उद्योगधंदे उभारले जात आहेत. अशा ठिकाणी कुशल मनुष्यबळाची मागणी सातत्याने वाढत असुन तरुण, तरुणींनी कौशल्यावर आधारित प्रशिक्षण घेऊन आपले आयुष्य समर्थपणे घडविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी केले.
        जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त  आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री जोंधळे बोलत होते.
            यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, सहाय्यक संचालक वि.का. भुसारे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी एन.एन. अहिरकर, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एम.आर. गायकवाड, नोडल अधिकारी सुरेश बहुरे, प्रशिक्षण अधिकारी अमोल बोरकर, आर.एस. फुले, सु.बा. कदम आदींची उपस्थिती होती.
            प्रगत राष्टांमध्ये मनुष्यबळाची अत्यंत कमतरता आहे.  सन 2022 पर्यंत भारत देशाची 64 टक्के लोकसंख्या ही 15 ते 59 वयोगटातील असणार असुन भारत देश हा जगातील सर्वात तरुण देशापैकी एक असेल व उत्पादन क्षमता असलेले मनुष्यबळ भारताकडे असेल.  पंतप्रधान यांच्या स्कील इंडिया संकल्पनेस अनुसरुन महाराष्ट्र राज्याने कुशल महाराष्ट्र, रोजगार युक्त महाराष्ट्र हे ध्येय समोर ठेवले असुन राज्यातील युवक, युवतींचे कौशल्य विकासाद्वारे सक्षमीकरणक रुन त्यांना अधिक मागणी असलेल्या उद्योग सेवा क्षेत्रात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मिळवून  देण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान राबविण्यात येत आहे.  जिल्ह्यातील 64 प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातुन युवक युवतींना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्यात येत असुन आजपर्यंत जवळपास 1 हजार 349 प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण पुर्ण केले असुन 2 हजार 320 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. जिल्ह्यातील अधिकाधिक तरुण, तरुंणानी नोकरीच्या मागे न लागता कौशल्यावर आधारित प्रशिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी  श्री जोंधळे यांनी यावेळी केले.
            जालना जिल्ह्यात ड्रायपोर्ट, समृद्धी महामार्गांतर्गत स्मार्ट शहरे यासारखे अनेक प्रकल्प येत आहेत.  याठिकाणी आवश्यक असणाऱ्या कौशल्याचे प्रशिक्षण युवक युवतींना देण्यात यावे.  तसेच जिल्ह्यात रेशीम कोषांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते. ग्रामीण भागातील युवक, युवतींनी कृषिक्षेत्राशी निगडीत कौशल्य आत्मसात केल्यास त्याचा मोठ्या प्रमाणात त्यांना फायदा होणार असल्याचेही जिल्हाधिकारी श्री जोंधळे यांनी यावेळी सांगितले.
            जिल्ह्यातील युवक, युवतींना प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षण संस्थांनी केवळ शासनाच्या अनुदानापुरते प्रशिक्षण संस्था न चालवता समाजाप्रती त्यांचेही काही देणे लागते या भावनेतुन गरजु तरुण, तरुणींना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देऊन तरुण, तरुणीसह त्यांच्या कुटूंबाला या माध्यमातुन उभे करण्यासाठी काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
            यावेळी कौशल्यावर आधारित प्रशिक्षण घेऊन स्वत:चा व्यवसाय तसेच नोकरी प्राप्त केलेल्या तरुण, तरुणींनी शासनाने सुरु केलेल्या या कार्यक्रमामुळे जीवनाला दिशा मिळाल्याची भावना व्यक्त केली.
            कार्यक्रमाचे संचलन भरत मोरे यांनी केले तर आभार यांनी एन.एन. अहिरकर  मानले.
            कार्यक्रमास अधकारी, प्रशिक्षण संस्था चालक तसेच तरुण, तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*******


Saturday 1 July 2017

पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते विविध ठिकाणी वृक्षारोपण

1 ते 7 जुलै वृक्ष लागवड सप्ताह तसेच वनमहोत्सवाच्या निमित्ताने राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.  सिरसवाडी येथील वनविभागाच्या जागेत पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.  वन विभागामार्फत या ठिकाणी 1 हजार 200 वृक्षांचे तसेच संपूर्ण जिल्ह्यात 75 हजार वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे.  या वृक्षारोपण कार्यक्रमात सेंट जॉन्स हायस्कुल व रेऑन इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला.  यावेळी सहाय्यक वनसंरक्षक श्री शिंदे यांनी वृक्षारोपणासंदर्भातील माहिती पालकमंत्री महोदयांना दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात वृक्षारोपण
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते वृक्षाचे रोपण करण्यात आले. याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी व पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी, जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या प्रांगणात वृक्षारोपण
 जालना येथे असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या प्रांगणात पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते वृक्षाचे रोपण करण्यात आले.  याप्रसंगी कार्यकारी अभियंता ए.जे. सिंह यांनी मंत्री महोदयांना वृक्षारोपणाची विस्तृत अशी माहिती दिली.
राज्य राखीव पोलीस दल तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्रांगणात वृक्षारोपण
जालना येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या प्रांगणात पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षाचे रोपण करण्यात आले.  यावेळी समादेशक भारत तांगडे म्हणाले की, राज्य राखीव पोलीस दलाच्या निवासव्यवस्थेचा तसेच दलाचा बळकटीकरणासाठी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी पाठपुरावा केल्यामुळे 192 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. पालकमंत्री श्री लोणीकर यांनी जवानांप्रती आत्मियता दर्शवून हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल त्यांचे आभारही समादेशकांनी यावेळी व्यक्त केले.


जिल्हा परिषद प्रांगणात पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते वृक्षारोपण

येथील जिल्हा परिषदेच्या प्रांगणात पालकमंत्री बबनराव लोणीकर  यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी आमदार राजेश टोपे,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीष टोपे, माजी आमदार अरविंद चव्हाण, रामेश्वर भांदरगे, सभापती दत्ता बनसोडे, सभापती श्रीमती जिजाबाई कळंबे, जि.प. सदस्य श्री जाधव, सदाशिव शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री धोत्रे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दशरथ तांभाळे आदींची उपस्थिती होती. 


शेतकऱ्यांनी पारंपरिक पीकाबरोबरच नगदी व हवामानावर आधारित पीके घ्यावीत- पालकमंत्री बबनराव लोणीकर

जालना, दि. 1 – भारत हा कृषिप्रधान देश आहे.  भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये कृषीचा फार मोठा वाटा आहे.  शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन मिळून त्यांचा अर्थिकस्तर उंचावण्यासाठी पारंपरिक शेतीपिकाबरोबरच नगदी व हवामानावर आधारित पीके शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
            माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधुन जिल्हा परिषद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कृषीदिन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री लोणीकर बोलत होते.
            याप्रसंगी व्यासपीठावर आमदार राजेश टोपे,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीष टोपे, माजी आमदार अरविंद चव्हाण, रामेश्वर भांदरगे, सभापती दत्ता बनसोडे, सभापती श्रीमती जिजाबाई कळंबे, जि.प. सदस्य श्री जाधव, सदाशिव शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री धोत्रे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दशरथ तांभाळे आदींची उपस्थिती होती.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांना राज्याच्या हरितक्रांतीचे प्रणेते म्हणून ओळखले जाते.  महाराष्ट्र राज्य अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावे या दृष्टीकोनातून स्व. वसंतराव नाईक यांनी मोलाचे काम केले होते.  नवनवीन बि-बियाणे, तसेच शेतीला शाश्वत पाणी देण्यासाठी जलसंधारणाची कामे केली होती.  त्यांनी केलेल्या कार्याची ओळख आजच्या पिढीला व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगत शासन शेतकऱ्यांप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन शेतीविकासासाठी अनेक नवनवीन योजना राबवित आहे. शेतीविकासासाठी शासनाने अर्थसंकल्पामध्ये 26 हजार कोटी रुपयांची तरतूद केली असुन शेतीविकासासाठीच्या नवनवीन योजनेच्या माध्यमातुन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            शेतकऱ्यांच्या शेतीला जोडधंदा म्हणून रेशीम उद्योग हा एक अत्यंत किफायतशीर असा जोडधंदा असुन यासाठी शासनामार्फत 2 लाख 55 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते.  रेशीम कोषाच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांना बेंगलोर येथे जावे लागत होते.  परंतू रेशीम कोषाचे खरेदी केंद्र जालना येथे करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली असल्याचे सांगत यासाठी 5 कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे.  रेशीम कोष खरेदी केंद्र कार्यान्वित झाल्यास जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान अत्यंत यशस्वीरित्या राबविण्यात येत असुन गतवर्षात 23 कोटी रुपये खर्चून 500 बंधारे उभारण्यात आले आहेत.  याकामी महाराजन ट्रस्ट, नाम फाऊंडेशन यांच्यासह इतर सेवाभावी संस्थांची मोलाची मदत मिळत असुन येणाऱ्या काळात संपूर्ण जालना जिल्हा टंचाईमुक्त करण्यासाठी सर्व नागरिकांनी जलयुक्त शिवार अभियानात सहभाग नोंदविण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
            मानवी जीवनामध्ये वृक्षांचे फार मोठे महत्व आहे.  गतकाळात राज्यासह मराठवाड्याला दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागला यामागचे कारण वृक्षांची घटत चाललेली संख्या असुन वृक्षांच्या कमतरतेमुळे पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे.  याच बाबीचा विचार करुन राज्य शासनाने येत्या 2019 पर्यंत राज्यात 50 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट डोळयासमोर ठेवले आहे.   त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी संपूर्ण राज्यात 4 कोटी वृक्षांची लागवड 1 ते 7 जुलै दरम्यान करण्यात येत आहे.  वृक्ष लागवड हा कार्यक्रम केवळ शासनाचा आहे ही मानसिकता समाजाने बदलण्याची आवश्यकता असुन वृक्ष लागवड व त्याचे संगोपन ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे ही भावना समाजामध्ये दृढ होण्याची आवश्यकता असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            आमदार राजेश टोपे म्हणाले की, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांनी त्यांच्या कार्यकाळात कृषी विकासासाठी अनेक योजना राबवित शेतकऱ्यांच्या शेतातील उत्पादकता वाढविण्यावर भर दिला. शेतकऱ्यांनी शेती किफायतशीर होण्यासाठी शेतीक्षेत्रातील नवनवीन ज्ञात आत्मसात करुन त्याला तंत्रज्ञानाची जोड देत हवामानावर आधारित शेती करावी.  द्राक्ष शेतीच्या माध्यमातून कडवंची या गावाने संपूर्ण राज्यात आपला एक वेगळा ठसा निर्माण केला असुन शेतकऱ्यांनी या गावचा आदर्श घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
            कृषिदिनाचे औचित्य साधुन जिल्हा परिषदेच्या आवारात उभारण्यात आलेल्या बि-बियाणे, कृषि औजारे व इतर कृषि साहित्याच्या प्रदर्शनीचे उदघाटनही पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले.  तसेच कृषिक्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करुन विविध पुरस्कारप्राप्त झालेल्या शेतकऱ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषीविकास अधिकारी श्री पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन तंत्र अधिकारी मनिषा मिसाळ यांनी केले तर आभार जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दशरथ तांभाळे यांनी मानले.

*******

मराठवाडा टंचाईमुक्त करण्यासाठी शाश्वत पाणी साठे निर्माणाबरोबरच वृक्षांची अधिकाधिक लागवड आवश्यक - पालकमंत्री बबनराव लोणीकर

जालना, दि. 1 – गतकाळात पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे मराठवाड्याला दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागला.  मराठवाडा संपूर्ण टंचाईमुक्त करावयाचा असेल तर शाश्वत पाण्याचे साठे निर्माण करण्याबरोबरच पाऊस पाडण्यासाठी कारणीभूत असलेल्या वृक्षांची अधिकाधिक लागवड करुन त्यांचे संगोपन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
4 कोटी वृक्ष लागवड सप्ताहाच्या व वन महोत्सवाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते वृक्षाची लागवड करुन करण्यात आला. तसेच माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन पालकमंत्री श्री लोणीकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री बोलत होते.
            व्यासपीठावर माजी आमदार अरविंद चव्हाण, रामेश्वर भांदरगे, सिद्धीविनायक मोरे, भुजंगराव गोरे, आयेशा खान, प्रभारी जिल्हाधिकारी पी.बी.खपले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, किशोर अग्रवाल, घनश्याम गोयल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री धोत्रे, अपर पोलीस अधीक्षक लता फड आदींची उपस्थिती होती.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, मानवी जीवनामध्ये वृक्षांचे फार मोठे महत्व आहे.  गतकाळात राज्यासह मराठवाड्याला दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागला यामागचे कारण वृक्षांची घटत चाललेली संख्या असुन वृक्षांच्या कमतरतेमुळे पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे.  याच बाबीचा विचार करुन राज्य शासनाने येत्या 2019 पर्यंत राज्यात 50 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट डोळयासमोर ठेवले आहे.   त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी संपूर्ण राज्यात 4 कोटी वृक्षांची लागवड          1 ते 7 जुलै दरम्यान करण्यात येत आहे.  वृक्ष लागवड हा कार्यक्रम केवळ शासनाचा आहे ही मानसिकता समाजाने बदलण्याची आवश्यकता असुन वृक्ष लागवड व त्याचे संगोपन ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे ही भावना समाजामध्ये दृढ होण्याची आवश्यकता असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            राज्यात विदर्भात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे.  मराठवाड्यात केवळ 4 टक्के व जालना जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्रापैकी केवळ 1.29 टक्के एवढेच वनक्षेत्र आहे. एकीकडे मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे, जल व वायु प्रदुषण वाढत असुन त्याप्रमाणात वृक्ष लागवड न होता त्याचे प्रमाण दिवसेंदिवस घटत आहे.  याचा परिणाम मानवी आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होत असल्याची चिंता व्यक्त करत मराठवाड्यासह जिल्ह्यात पाऊस पाडण्यास कारणीभुत असलेल्या अधिकाधिक वृक्षांची लागवड करण्याचे आवाहन करत प्रत्येक शासकीय विभागाला देण्यात आलेल्या वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करावे.  लागवड केलेल्या वृक्षांची तपासणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            शेतीला शाश्वत पाणीसाठे निर्माण करण्यासाठी राज्यात गत दोन वर्षापासून जलयुक्त शिवार अभियान हा महत्वाकांक्षी कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्यात येत असून या अभियानाच्या माध्यमातून 15 हजार गावाच्या नद्यांचे खोलीकरण, रुंदीकरण करण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात आला आहे.  गावोगावी जलयुक्तच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली असुन या कामांमध्ये पाण्याचा संचयही झाला असुन महाराष्ट्र राज्य टंचाईमुक्त करण्यासाठी सर्वांनी या महत्वाकांक्षी अभियानात सहभाग नोंदविण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी केले.
            गतवर्षात वृक्ष लागवड सप्ताहामध्ये लागवड करण्यात आलेल्या वृक्षांची पहाणीही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी केली.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दशरथ तांभाळे यांनी केले.  कार्यक्रमाचे संचलन नायब तहसिलदार श्रीमती मयुरा पेरे यांनी केले तर आभार नायब तहसिलदार संदीप ढाकणे यांनी मानले. कार्यक्रमास पदाधिकारी तसेच प्रशासकीय इमारतीमधील अधिकारी, कर्मचारी, महिला कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.