Saturday 17 September 2016

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शहिदांना पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत मानवंदना

जालना, दि. 16 –  मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त टाऊन हॉल येथील स्मृती स्तंभास पुष्पचक्र वाहून राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली तर पोलीस जवानांनी हवेत तीन फेरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना दिली. जिल्हयात आज सर्वत्र मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
            शहरातील टाऊन हॉल जवळच्या मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मृती स्तंभास आज मुख्य शासकीय ध्वजवंदना आणि हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जनतेला उद्देशुन शुभेच्छा संदेशही दिला.
            याप्रसंगी स्वातंत्र्य सैनिक श्रिन्नया शिवलिंगु बैभारी, श्रीमती मंगलाबाई लक्ष्मीनारायण गिंदोडिया, श्रीमती कांताबाई विश्वंभरराव मिटकर, श्रीमती राणीरंभा अजीजखॉ, श्रीमती चांदबाई कटारिया, श्रीमती प्रभावती जोशी, रामेश्वर लादूराम दायमा यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येऊन मान्यवरांनी स्वातंत्र्य सैनिकांसह उपस्थित नागरिकांना मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मान्यवरांनी लोकमान्य टिळक यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
            या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम जाधव, नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, उपनगराध्यक्ष शहा आलम खान, रामेश्वर भांदरगे, एकबाल पाशा, विलास नाईक, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, अपर जिल्हाधिकारी पी.बी. खपले, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) डॉ. एन.आर. शेळके, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजेश जोशी, जिल्हा नियोजन अधिकारी रवींद्र जगताप, सहाय्यक आयुक्त सामाजकल्याण श्री शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

***-***



शेतकऱ्यांच्या हिताचे राज्याचे नवे कृषी धोरण आणण्यासाठी प्रयत्नशिल-- कृषि मंत्री पांडूरंग फुंडकर

जालना, दि. 17 –शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून शासन शेतकऱ्यांच्या विकासासाठी अनेकविध योजना राबवित आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला रास्त भाव मिळून त्याचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचिण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या हिताचे राज्याचे एक नवे कृषी धोरण येत्या काळात आणण्यासाठी आपण प्रयत्नशिल राहणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषि व फलोत्पादन मंत्री पांडूरंग फुंडकर यांनी केले.
            वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी व कृषि विभाग, जालना यांच्यासंयुक्त विद्यमाने कृषि महाविद्यालय, बदनापुर येथे रबी पीक शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना कृषिमंत्री श्री फुंडकर बोलत होते.
            यावेळी व्यासपीठावर राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, खासदार रावसाहेब दानवे-पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम जाधव, उपाध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, आमदार नारायण कुचे, माजी आमदार विजय गव्हाणे, माजी आमदार श्रीमती ढोरे,रामेश्वर भांदरगे,  जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी दीपक चौधरी, परभणी येथील कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.बी. वेंकटेश्वरलू, पुणे येथील कृषि परिषदेचे उपाध्यक्ष राम खर्चे, कृषि तज्ज्ञ विजयअण्णा बोराडे, विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य डॉ. पी.आर. शिवपुत्रे, गोविंद देशमुख, अनंतराव चोंदे, रविंद्र देशमुख, कुलसचिव दिलीप कच्छवे, डॉ. ए.एस. ढवन, डॉ. दत्तप्रसाद वासकर, विभागीय कृषि सहसंचालक रमेश भताने, विस्तार शिक्षणचे संचालक डॉ. बी.बी. भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे आदींची उपस्थित होती.
            यावेळी मार्गदर्शन करताना कृषिमंत्री श्री फुंडकर म्हणाले की, आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शेतकऱ्यांनी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याची गरज असून बदलत्या हवामानानुसार शेती करण्याची गरज आहे.  कमी पाण्यावर व कमी वेळात अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांची तसेच देशी वाणांच्या निर्मितीवर भर देण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या शेतीला मुबलक व शाश्वत पाणी, वीज व उत्पादन खर्चावर आधारित भाव शेतकऱ्यांच्या पिकाला मिळण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशिल असल्याचे सांगत  शेतकऱ्यांच्या कष्टाचं चीज होऊन त्यांना शेतकऱ्यांना स्वाभिमानाने जगता यावं यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणारअसल्याचेही कृषिमंत्री श्री फुंडकर यांनी सांगितले.
            जगात कृषि क्षेत्रात होत असलेली नवनवीन संशोधने तसेच राज्यातील कृषि विद्यापीठाच्या माध्यमातून विविध वाणांचे संशोधन करुन त्याचा लाभ राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच आत्माच्या माध्यमातून गटशेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल परदेशापर्यंत पोहोचावा व याचा चांगल्या प्रमाणात शेतकऱ्यांना मोबदला मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करत शेतकऱ्यांनी पारंपरित शेतीबरोबरच शेतीला किफायतशीर असे जोडधंदे करण्याची गरज असल्याचेही कृषिमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
            रबी पिकांमध्ये घेण्यात येणाऱ्या पिकासंदर्भात शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने या शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगत मराठवाड्याच्या मुक्तीसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करुन उपस्थित सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कृषिमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.

            यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर म्हणाले की, कृषि क्षेत्रामध्ये नवनवीन अधिक उत्पन्न देणाऱ्या विविध प्रजातींची निर्मिती करुन आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकऱ्यांच्या प्रगती व उन्नतीसाठी शासन प्रयत्नशिल आहे.  शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबरच आधुनिक पद्धतीने शेती करणे ही काळाची गरज बनली आहे. शेतीला जोडधंदा म्हणून रेशीम उद्योग हा एक किफायतशीर असा उद्योग असून शासनामार्फत या उद्योगासाठी प्रतीहेक्टरी 2 लाख 55 हजार रुपये एका हेक्टरसाठी सबसीडी म्हणून देण्यात येतात.  जालना शहरातील रेमीश उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांना कोष खरेदी, विक्रीसाठी बँगलोर येथे जावे लागत होते.  परंतू संपूर्ण मराठवाड्यासाठीचे खरेदी व विक्री केंद्र जालना येथे होत असून यासाठी शासनाने भरीव असा निधीही मंजूर केला आहे.  जालना जिल्हा हा फळबागांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.  मोसंबी पिकाचे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन होते.  या मोसंबीवर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पासाठी शासनाने 52 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            शेतीला शाश्वत व मुबलक प्रमाणात पाणी मिळण्यासाठी जलयुक्त शिवार ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. गतवर्षात राज्यात 5 हजार गावांमधून ही योजना यशस्वीरित्या राबविण्यात आली तर लोकसहभागातून 400 कोटी खर्चून एक हजार गावातून जलसंधारणाची कामे करण्यात आली येणाऱ्या काळातही ही योजना संपूर्ण राज्यात यशस्वीरित्या राबविण्यात येणार असल्याचे सांगत शहरातील अशुद्ध पाण्यावर प्रक्रिया करुन हे पाणी शेतीला देण्यासाठी जिल्ह्यात प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.  
            यावेळी मार्गदर्शन करताना खासदार रावसाहेब दानवे म्हणाले की, गेल्या तीन वर्षात पावसाच्या अल्प प्रमाणामुळे मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती होती. अशा परिस्थिती शासनाने अनेकविध योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले सून शेतकऱ्यांनो आत्महत्या करु नका शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे खा. दानवे यांनी यावेळी सांगितले.
            शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत शेती करणे आवश्यक झाले असून कृषी क्षेत्रात पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता आपल्या ज्ञानाचा फायदा शेती विकसित करण्यासाठी करावा, अशी अपेक्षा व्यक्त करत राज्यात जलयुक्त शिवार अभियानातून           1 हजार 400 कोटी रुपये खर्चून जलसंधारणाची विविध कामे यशस्वीरित्या करण्यात आली असून 24 टीएमसी पाणी अडविण्यात व साठविण्यात शासनास यश आल्याचेही खासदार श्री दानवे यांनी यावेळी सांगितले.
            आपल्या मार्गदर्शनपर भाषणात कुलगुरु बी. वेंकटेश्वरलू यांनी येणाऱ्या काळात विद्यापिठातील मनुष्यबळ सक्षम करण्याबरोबरच अनेकविध वाणांचे संशोधन करुन ते अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोविण्यात येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
            याप्रसंगी कृषि परिषदेचे उपाध्यक्ष राम खर्चे,आमदार नारायण कुचे, माजी आमदार विजय गव्हाणे यांचीही समयोचित भाषणे झाली.  सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते बियाणे विक्री केंद्र, कृषि प्रदर्शन तसेच पॉली हाऊसचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान शेतीभाती रबी पीक विशेषांक, पीक संरक्षण मोहिम पुस्तिका तसेच मोसंबी ॲपचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.  कार्यक्रमाची सुरुवात स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलनाने करण्यात आली.  कार्यक्रमाचे संचलन डॉ. विना भालेराव यांनी केले.
            मेळाव्यास पदाधिकारी, अधिकारी, महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*******



Thursday 15 September 2016

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

जालना, दि. 15 –  मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त दि. 17 सप्टेंबर, 2016 रोजी सकाळी 9-00 वाजता टाऊन हॉल, जुना जालना येथे राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे. 
            सर्व शासकीय, निमशासकीय, सहकारी संस्था तसेच सर्व कार्यालयातील  अधिकारी, कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय पोषाखात या ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित रहावे,असे जिल्हा प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.

*******

जालना जिल्ह्यात सरासरी 14.41 मि.मी. पावसाची नोंद

जालना, दि. 15- जिल्ह्यात 15 सप्टेंबर 2016 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात सरासरी 14.41 मि.मी एवढ्या एकूण पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदाच्या एकूण पावसाची आहे.
            जालना- 13.63 (605.01), बदनापूर-3.60 (584.20), भोकरदन-1.50 (439.63),जाफ्राबाद-निरंक  (440.40), परतूर-27.60 (654.60), मंठा- 20.25 (567.50), अंबड- 28.29(602.72) घनसावंगी-20.43 (520.00) मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 688.21 मि.मी. एवढी असून 1 जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात 553.18  मि.मी. एवढा पाऊस झाला असून त्याची सरासरी 80.37 टक्के एवढी आहे.

***-***

Wednesday 14 September 2016

मंठा शहराचा सर्वांगिण विकास करणार-- पालकमंत्री बबनराव लोणीकर

जालना –  मंठा शहराचा विस्तार झपाट्याने होत असून शहराच्या सर्वांगिण विकास करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशिल राहणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
            मंठा येथील मार्केट यार्ड येथे नवयुवक राजे छत्रपती गणेश मंडळाने आयोजित केलेल्या महाआरतीप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री लोणीकर बोलत होते.
            यावेळी गोपाळराव बोराडे, अंकुशराव अवचार, कल्याणराव बोराडे,  अंकुशराव बोराडे, सखाराम बोराडे, बाबुराव शहाणे, गणेश खवणे, प्रदीप बोराडे, सोनाबापू बोराडे, पंजाबराव बोराडे, अंकुश कदम, काशिनाथ बोराडे, राजाभाऊ बोराडे, श्री झंवर, श्री खरात, उप विभागीय अधिकारी अरविंद लोखंडे, तहसिलदार श्री सोनवणे, कलंबर खाँ पठाण, शेख एजाज, इसाक पटेल, बी.डी. पवार, सहदेव मोरे आदींची उपस्थित होती.
            यावेळी बोलताना पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, मंठा शहराच्या विकासासाठी आपण विशेष लेख देणार असल्याचे सांगत जलयुक्त शिवार अभियान, स्वच्छता अभियान, डासमुक्ती यासारखे अभियान‍ यशस्वीपणे राबविण्यात येत असून मंठा शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी 15 कोटी 37 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामाला गती देण्यात येत आहे. ही योजना येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून या योजनेच्या माध्यमातून मंठावासियांना पाण्याचा पुरवठा करण्यात येणार असून या योजनेसाठी विद्युत विभागामार्फत अखंडित वीज पुरवठा करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
             मंठा शहरातील सांडपाणी शहरातील मंठा नदीमध्ये सोडण्यात येते.  या सांडपाण्यावर प्रक्रिया करुन हे पाणी शेतीला वापरण्यासाठी 3 कोटी 15 लक्ष रुपयांचा निधी नाबार्डच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला असल्याचही माहितीही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी उपस्थितांना दिली.
            संपूर्ण राज्यात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी शासनामार्फत भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात येत असून मंठा शहरातील मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येणार असून या कामासाठी 1 कोटी 30 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून रस्त्यांच्या बाजुचे सुशोभीकरणही करण्यात येणार असून मंठा व परतूर शहरातील विद्युत खांबावर एलईडी लाईट बसवण्याबरोबरच अल्पसंख्यांक बहुलक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत वसतीसाठी 10 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
             महाराष्ट्र राज्य स्वच्छता अभियानामध्ये प्रथम क्रमांकावर आहे तर जालना जिल्हा आठव्या क्रमांकावर आहे.  जालना जिल्हा स्वच्छ व सुंदर करुन स्वच्छतेच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर येण्यासाठी  समाजातील प्रत्येक नागरिकाने सहभाग नोंदविण्याचे आवाहन करत पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की,  स्वच्छतेचा मंत्र प्रत्येकाने अंगी बाळगण्याची आवश्यकता आहे.  स्वच्छता ही यशाची गुरुकिल्ली आहे.  स्वच्छतेमुळे मानवी आरोग्य सदृढ राहण्याबरोबरच मनही प्रसन्न राहते.  अस्वच्छतेमुळे मानवाला अनेक रोगांचा सामना करावा लागतो.  स्वच्छता ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी असल्याचे सांगून आपले तन व मन सदृढ राहण्यासाठी स्वच्छतेची सवय प्रत्येकाने बाळगण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            जिल्ह्याच्या विकासाला दिशा देण्यासाठी, चर्चा करण्यासाठी विकासात्मक दृष्टीकोन ठेऊन जिल्ह्यातील विविध गणेश मंडळे समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत. ही बाब अभिनंदनीय आहे. लोकमान्य टिळकांनी सर्व नागरिकांनी एकत्रित यावेत या उद्देशाने सुरु केलेल्या या सार्वजनिक उत्सवाला आता विराट स्वरुप प्राप्त झाले असून या उत्सवामध्ये सर्व जाती-धर्माचे नागरिक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात ही  एक अत्यंत चांगली बाब असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            या महाआरतीस अजय अवचार, सतीष निर्वळ, अशोक वायाळ, राधाकिसन बोराडे, बाजीराव बोराडे, संजय गायकवाड, नारायण दवणे, संजय बोराडे, रोहित बोराडे, दत्ता गोरे, भगवान कुलकर्णी, सचिन बोराडे, दत्ता हातकडके, ज्ञानेश्वर गोंडगे यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*******