जालना
दि. 15 (जिमाका) :- शेतकऱ्यांनी 75 ते 100 मि मी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी.
प्रति हेक्टर बियाणे दर 75 किलोवरुन 50 ते 55 किलोवर आणण्यासाठी टोकण पध्दतीने
पेरणी करावी. सोयाबीनची उगवण क्षमता 70 टक्के पेक्षा कमी असल्यास उगवण क्षमतेच्या
प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरावे. पेरणीपुर्वी प्रती किलो बियाणास 3 ग्रॅम
थायरमची बुरशीजन्य रोगापासुन संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी. रायझोबियम व पीएसबी
जीवाणू संवर्धकाची प्रत्येकी 200 ते 250 ग्रॅम प्रति 10 ते 15 किलो बियाणास
पेरणीपूर्वी तीन तास बियाणास पेरणीपूर्व तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करुन बियाणे
सावलीत वाळवावे व नंतर पेरणी करावी.
बियाणाची पेरणी 3 ते 4 से.मी. खोलीपर्यंत करावी. तसेच पेरणीसाठी स्वत:कडे उपलब्ध
असलेले चांगले बियाणे वापरावे. अशी
माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
भिमराव रणदिवे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment