जालना दि. 3 (जिमाका) :- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना -2019
अंतर्गत ज्या शेतक-यांनी
अद्याप पर्यंत आपले आधार प्रमाणिकरण केलेले नाही. त्यांनी
आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणिकरण करावे जेणेकरुन त्यांना
कर्जमाफीचा लाभ लवकरात लवकर मिळू शकतो तसेच ज्या शेतक-यांनी आधार
प्रमाणिकरण करताना ऑनलाईन तक्रारी नोंदविलेल्या आहेत. अशा
तक्रारी संबंधाने बँक शाखा स्तरावर शेतक-यांकडून
आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करुन घेण्याचे कामकाज सुरु आहे. तक्रारी त्वरीत निकाली काढण्याचे दृष्टीने ज्या शेतक-यांनी योजनेअंतर्गत ऑनलाईन तक्रार नोंदविल्या आहेत. त्यांनी त्यांचे कर्जासंबंधीचे आवश्यक कागदपत्रे जसे तक्रार नोंदविल्याची
स्लीप, आधार कार्ड, बँक पासबुक, सभासद मयत असल्यास
मृत्युचे प्रमाणपत्र व इतर पुरावे घेऊन संबंधीत तालुक्याचे सहाय्यक निबंधक, कार्यालयास प्रत्यक्ष दयावे जेणेकरुन कर्जमाफीचा लाभ तात्काळ संबंधीतास
मिळेल असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून
करण्यात येत आहे.
-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment