जालना, दि. 19 (जिमाका):- भारतीय स्टेट बँकेच्या जालना जिल्हयातील
शाखांना संलग्न असलेल्या गावांमधील शेतकऱ्यांनी सुलभ पीक कर्ज नुतनीकरण
योजनेअंतर्गत बँकेच्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांच्या पीककर्जाचे नुतनीकरण
करण्यात येऊन त्यांना तात्काळ नव्याने पीक कर्ज मंजूर करण्यात येणार आहे.
या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेऊन आपल्या पीक
कर्जाचे नुतनीकरण करुन घ्यावे, असे आवाहन क्षेत्रीय प्रबंधक, भारतीय स्टेट बँक ऑफ
जालना तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जालना यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे
केले आहे.
-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment