जालना
दि. 22 (जिमाका) :- जिल्ह्यामध्ये
सदस्थितीत महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने पीक कर्ज नुतनीकरण
सुरु आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या थकबाकीदार झालेल्या शेतक-यांना बँकेच्या
वतीने “ महाग्रामीण बळीराजा तारणहार योजना(एमबीटीवाय)
व महाग्रामीण राहत योजना (एमजीआरवाय) एकरकमी कर्ज परतफेड (ओटीएस) योजना ” 30 सप्टेंबर 2022 पर्यंत सुरु आहेत.
महाग्रामीण बळीराजा
तारणहार योजनेतील लाभार्थ्यांना पुन्हा कर्ज मिळण्याची संधी उपलब्ध असुन थकबाकीदार
शेतक-यांनी पीककर्ज नुतनीकरण केल्यास पात्र शेतक-यांना वाढीव कर्ज सुद्धा देण्यात
येणार आहे.
तरी जिल्हयातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या थकबाकीदार
शेतक-यांनी वरील योजनेचा लाभ घेऊन त्यांचेकडील थकीत रकमेची परतफेड करण्यासाठी
बँकेच्या संबंधित शाखेस भेट दयावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत
आहे.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment