Wednesday 27 July 2022

30 व 31 जुलै रोजी मुद्रांक जिल्हाधिकारी यांचे कार्यालय सुरु राहणार

 


 

जालना दि. 27 (जिमाका) :-  दंड माफी योजना 2022 चा पहिला टप्पा हा दि.31 जुलै 2022 रोजी संपत आहे. योजनेनुसार दि. 31 जुलै 2022 पर्यंत या योजनेचा सहभाग नोंदल्यास थकलेल्या मुद्रांक शुल्काच्या दंडास जवळपास 90 टक्के माफी शासनाने दिलेली आहे व दि. 1 ऑगस्ट 2022 नंतर सहभाग नोंदविणाऱ्यास थकलेल्या मुद्रांक दंडास 50 टक्के माफी राहणार आहे.

दि. 30 जुलै व दि. 31 जुलै 2022 रोजी पाचवा व शनिवार व रविवार असल्याने वरील दिवशी फक्त याच कामाकरीता राज्यातील सर्व मुद्रांक जिल्हाधिकारी यांची कार्यालये उघडी राहतील.

अशी माहिती सह जिल्हा निबंधक वर्ग -1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment