जालना दि 13
(जिमाका):- अग्नीवीर योजनेंतर्गत दि. 13 ऑगस्ट 2022 ते 8 सप्टेंबर 2022 दरम्यान औरंगाबाद येथील डॉ.
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या स्टेडीयमवर सैन्य दलातील विविध पदांसाठी भरती प्रक्रियेचे आयोजन
करण्यात आले आहे. या भरतीमध्ये औरंगाबाद, जालना, बुलढाणा, हिंगोली, नांदेड, परभणी आणि
जळगाव या जिल्ह्यांतील तरुणांना सहभागी होता येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रीया पूर्णपणे ऑनलाईन
स्वरुपाची असुन इच्छुक तरुणांनी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट देऊन
अर्ज प्रक्रीया पूर्ण करावी. प्राप्त अर्जाची छाननी इंडियन आर्मीव्दारे होणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मैदानावर भरती संदर्भातील शारिरीक चाचणी
तसेच संबंधित प्रक्रीया पार पडणार आहे. इच्छुक तरुणांनी
www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला
भेट देऊन अर्ज करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment