जालना दि. 20 (जिमाका) :- जालना
जिल्ह्यात दि.21 जुलै 2022 ते 12
ऑगस्ट 2022 पर्यंत माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक परीक्षा सुरु होत आहे. तसेच दि. 22 जुलै 2022 रोजी शेगाव
श्री. गजानन महाराज दिंडी पंढरपूर येथुन परतीच्या मार्गावर असून जालना जिल्ह्यात आगमन
होत आहे व दि. 26 जुलै 2022 रोजी नाव्हा मार्गे सिंदखेड राजा जि. बुलढाणा हद्दीत
जाणार आहे. या पालखीचे दर्शनासाठी भाविकांची गर्दी राहणार आहे. दि. 29 जुलै 2022
रोजी श्रावण मासारंभ सुरु होत असून दि.2 ऑगस्ट 2022 रोजी नागपंचमी सण साजरा होत
आहे. दि.31 जुलै 2022 ते दि. 9 ऑगस्ट 2022 पर्यंत मुस्लीम बांधवांचा मोहरम उत्सव
साजरा होणार आहे. या सण उत्सवाचे काळात जालना जिल्ह्यात व शहरात विविध ठिकाणी
विविध पक्ष, संघटना कडून मिरवणुका काढण्यात येतात. या मिरवणुक किरकोळ कारणावरुन
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच मराठा आरक्षण, ओबीसी
आरक्षण मिळावे या मागणीसाठी तसेच शेतक-यांचे विविध मागणीसाठी विविध संघटनांकडून
आत्मदहन, उपोषण, धरणे, मोर्चे, निदर्शने, रास्तारोको इत्यादी सर्व प्रकारण्ची
आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्तता नाकरता येत नाही.
त्यामुळे अपर
जिल्हादंडाधिकारी जालना यांना प्राप्त
अधिकारानुसार पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये शासकीय कर्तव्य पार
पाडणा-या कर्मचा-यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा
त्या आसपास शस्त्रे, लाठ्या, सोटे, बंदुके, तलवारी , भाले, चाकु व इतर
शरीरास इजा अथवा अपाय करणा-या वस्तु जवळ बाळगणार नाही. तीक्ष्ण पदार्थ अथवा
स्फोटके सहज हाताळता येतील अशी घातक वस्तु जवळ बाळगणार नाही. दगड किंवा इतर उपकरणे
किंवा प्रवर्तक शस्त्रे गोळा करुन ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाही.
व्यक्तींच्या किंवा समुहाच्या भावना जाणुनबुजुन दुखविण्याचे उद्देशाने असभ्यतेने
भाषण म्हणणार नाही, वाद्य वाजविणार नाही, गाणे म्हणणार नाही. व्यक्तींचे किंवा शवाचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे
प्रदर्शन करणार नाही. आवेषी भाषण, अंगविक्षेप,विडंबनापर नकला करणार नाही आणि सभ्यता किंवा
नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा
कोणतीही वस्तु बाळगणार नाही.
तसेच अपर
जिल्हादंडाधिकारी जालना यांना
प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये पाच किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई केली आहे.
हा
आदेश कामावरील कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी यांना लागु होणार नाही. तसेच विवाह, अंत्ययात्रा आणि पोलीस अधिक्षक जालना व
उपविभागीय पोलीस अधिकारी जालना, अंबड, परतुर,
भोकरदन यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुका, सभा, मोर्चा यांना लागु राहणार नाही.
हा आदेश संपुर्ण जिल्ह्यासाठी दि.
19
जुलै 2022 रोजीच्या 6.00 वाजेपासुन ते दि.5 ऑगस्ट 2022
रोजीचे रात्री 12.00 वाजेपर्यंत अंमलात राहील.
No comments:
Post a Comment