जालना दि. 14 (जिमाका):- जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत राष्ट्रीयीकृत, ग्रामीण
आणि सहकारी बँकांमार्फत पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरु असून जिल्ह्यात कार्यरत असलेल्या
कॅनरा बँक व युनियन बँक ऑफ इंडिया या बॅकांनी त्यांच्याकडे खातेदार असलेल्या आणि थकबाकीदार
झालेल्या शेतकऱ्यांसाठी एकरकमी कर्ज परतफेड योजना ओटीएस सुरु केली आहे.
कॅनरा बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया या दोन्ही बँकांची
एकरकमी कर्ज परतफेड योजना ओटीएस दि. 15 ऑगस्ट 2022 पर्यंत लागु असणार आहे.
तरी जिल्ह्यातील कॅनरा व युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या
संबंधित बँक शाखेला संलग्न असलेल्या गावांमधील थकबाकीदार खातेदारांनी त्यांच्याकडील
थकीत रक्कमेची या एकरकमी कर्ज परतफेड योजने ओटीएस अंतर्गत परतफेड करण्यासाठी बँक शाखेस
भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment