जालना, दि. 26 (जिमाका) :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त्त जिल्हा कोषागार
कार्यालय व त्यांच्या अधिनस्त सात उपकोषागारे कार्यालयाच्यावतीने मागील तीन
दिवसांत वृक्षरोपणाची मोहिम राबविण्यात आली.
जिल्हा कोषागार अधिकारी सचिन चंद्रशेखर धस यांच्या मार्गदर्शनाखाली मागील
शनिवार, रविवार व सोमवारी राबविण्यात आलेल्या या मोहिमेत अपर कोषागार अधिकारी
जयश्री कुलकर्णी, अपर कोषागार अधिकारी सूर्यकांत धोंगडे, श्री. सोईफ यांच्यासह
सर्व सात तालुक्यांतील उपकोषागार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग
घेतला. केवळ वृक्षारोपण करूनच ते थांबले नाहीत, तर त्यासाठी सुरक्षित ट्री गार्ड व
पाण्याची सोय यांचाही त्यांनी विचार करून नियोजनपूर्वक वृक्षारोपण केले. फक्त
दिलेले उद्दिष्ट पार पाडायचे, असा मूळीच हेतू नसून हे काम आमच्या सर्वांच्या
आवडीचे व निसर्गासाठी आहे, असे श्री. धस यांनी यावेळी सांगितले.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment