जालना, दि. 12 (जिमाका) :- शासकीय तंत्रनिकेतन जालना मध्ये दिनांक 8 ऑगास्ट 2022
रोजी आजादी का अमृत महोत्सव व महाराष्ट्र शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्हा
कोषागार अधिकारी सचिन धस साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी 800 रोपांची
लागवड करण्यात आली. संस्थेचे प्राचार्य डॉ. मं. दे. बाघमारे, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक,
अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. प्राध्यापक व्ही एम विन्हाडे यांनी समन्वयक
म्हणून जबाबदारी पार पडली.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment