जालना, दि. 10 (जिमाका):- भारतीय
स्वातंत्र्याला 75 वर्षे पुर्ण होत असल्याच्या पार्श्वभुमीवर दि. 13 ते 15 ऑगस्ट
2022 या कालावधीसाठी “ हर घर तिरंगा” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सहकार विभागाशी
संबंधित सर्व कार्यालये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, नागरी सहकारी बँका,जिल्ह्यातील
कृषि उत्पन्न बाजार समित्या, तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, नागरी सहकारी पतसंस्थांचा
संघ, नागरी, कर्मचारी सहकारी पतसंस्था, जिल्हा मंजूर सहकारी संघ, तसेच जिल्ह्यातील
सर्व सहकारी संस्थांनी तसेच संस्थांच्या सभासदांनी “ हर घर
तिरंगा” उपक्रम
राबविण्याबाबत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जालना जालना यांच्यामार्फत आवाहन करण्यात येत आहे.
या
कालावधीत सर्व कार्यालयांमध्ये “ स्वातंत्र्याचा
अमृत महोत्सव ” याबाबतचा लोगो लावणे,सर्व सहकारी संस्थांमध्ये ध्वज
संहितेचे काटेकोरपणे पालन करुन राष्ट्रध्वज फडकविणे, संस्थेने त्यांच्या सभासदांना
देखील याबाबत प्रेरित करणे, तसेच या कालावधीत राष्ट्रध्वजाला समर्पित विशेष संमेलने,
चर्चासत्रे, शिबीरे, राष्ट्रभक्तीपर सांस्कृतिक इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन संस्थांनी
स्वयंस्फुर्तीने करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment