Tuesday 2 August 2022

जेव्हा समाज कल्याण अधिकारी शासकीय वसतीगृहात मुक्कामाला जातात... संवाद उपक्रमांतर्गत राज्यातील अधिकाऱ्यांचा शासकीय वसतीगृहात मुक्काम विद्यार्थ्यांकडून उपक्रमाचे स्वागत'

 


    जालना दि. 2 (जिमाका) :-  राज्याच्या समाज कल्याण विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या शासकीय वसतीगृह योजनेबाबत विद्यार्थ्याकडून सोयी सुविधांबाबत तक्रारी केल्या जातात, प्रश्न उपस्थित केले जातात, याबाबत त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी समाज कल्याण आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे यांनी संवाद कार्यक्रम हा अभिनव उपक्रम राबविण्यात निर्णय घेतला आहे.

    याच संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील सर्व अधिकारी यानी थेट विद्यार्थ्यांसोबतच दिनांक २७ रोजी येथील शासकीय वसतीगृहात रात्रभर मुक्काम ठोकून विद्यार्थ्यांची संवाद साधला आहे. या उपक्रमाचे विद्यार्थ्याकडून जोरदार स्वागत करण्यात आले असून राज्यात प्रथमच अशा प्रकारे एखाद्या विभागाचा प्रमुख वसतीगृहात रात्रभर मुक्काम करण्याची घटना घडली आहे. या संवाद उपक्रमामुळे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना देखील सुखद धक्का बसला आहे.

आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी देखील पुणे येथील वसतिगृहात मुक्कम करुन स्वतः विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधत त्यांना मिळणाऱ्या सुविधा, जेवण व विद्यार्थ्या मार्फत राबविण्यात येणारे उपक्रम याबाबत माहिती जाणून घेतली.

तसेच यापुढेही प्रत्येक महिन्यात विद्यार्थ्यांबरोबर मुक्काम करण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्याबाबत आयुक्त यांनी ऑनलाइन बैठक घेऊनच दिनांक 27 जुलै 2022 रोजी त्या संदर्भात निर्देश दिले होते.

दिनांक 1 ऑगस्ट 2022 रोजी सहायक आयुक्त, समाज कल्याण जालना यांनी जालना परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकिय वसतिगृह, जालना या वसतिगृहात मुक्काम केला आहे. तसेच सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचा-यांनी जालना जिल्ह्यातील इतर तालुक्यामधील वसतिगृह व निवासी शाळेतील विद्यार्थ्यांबरोबरच वसतिगृहत मुक्काम करुन त्यांचे सोबत संवाद व जेवण केले.

आयुक्त, समाज कल्याण यांच्या संवाद कार्यक्रम संकल्पनेने विद्यार्थी देखील भारावून गेले. विद्यार्थ्यांना देखील अनेक गोष्टींवर मनमोकळ्या गप्पा केल्यात. यावेळी त्यांनी वसतिगृह गृहपाल व अधिक्षक यांना वसतीगृहात निवास करणे बाबत सक्त ताकीद दिली. व तक्रारी प्राप्त झाल्यास सक्त कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

 

   विद्यार्थ्यांच्या सूचना व मागणीनुसार त्यांना योग्य त्या सुविधा पुरविण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी कौशल्य विकास कार्यक्रम तसेच विविध तज्ञ व्यक्तींचे व्याख्यान आयोजित करणे बाबत देखील निर्देश यावेळी आयुक्त यांच्या वतीने देण्यात आले आहेत. अशी माहिती सहाय्यक आयुक्त अमित घवले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment