जालना, दि.
1 (जिमाका):- दि.13 ते 15 ऑगस्ट 2022
या कालावधीत “घरोघरी तिरंगा” हा उपक्रम राबविण्यात येणार असुन उमेद स्वयं सहायता गटाने स्थापन
केलेल्या ध्वज विक्री केंद्राचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
मनुज जिंदल यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या आवारात करण्यात आला.
या प्रसंगी जिल्हा अभियान सहसंचालक तथा प्रकल्प संचालक विलास
खिल्लारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे, जिल्हा अभियान व्यवस्थापक शैलेश
चौधरी यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
“घरोघरी तिरंगा” या अभियानात जालना जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या
घरावर तिरंगा फडकावा असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी
मनुज जिंदल यांनी यावेळी केले.
-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment