Friday 19 August 2022

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा निरंतर लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी आवश्यक

 


 

                जालना दि. 19 (जिमाका) :-  जिल्ह्यातील सर्व प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये अनुदान वितरीत करण्यास प्रारंभ झालेला आहे. ज्या लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची ई- केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांचा पुढील हप्ता बँक खात्यामध्ये जमा होणार नाही. सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट 2022 पासून योजनेच्या पुढील लाभाचे हप्ते निरंतर मिळण्याकरीता ई- केवायसीची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आलेली आहे.

            याकरीता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) https://pmkisan.gov.in या वेबसाईटवरील Former  Corner या टॅबमध्ये किंवा पी.एम. किसान ॲपद्वारे ओटीपी आधारे लाभार्थ्यांना स्वत: ई - केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल.   ग्राहक सेवा केंद्र (सीएससी) केंद्रावर ई-केवायसी प्रमाणीकरण बायोमॅट्रिक पध्दतीने करता येईल.

            केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्र (सीएससी) केंद्रावर बायोमॅट्रिक पध्दतीने ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी प्रती लाभार्थी प्रती बायोमॅट्रिक प्रमाणीकरण दर शासनामार्फत रुपये 15/- फक्त निश्चित करण्यात आला आहे.

            पी.एम. किसान योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना पुढील ऑगस्ट -नोव्हेंबर 2022 या कालावधीची लाभ प्राप्त होण्यापुर्वी ई-केवायसी प्रमाणीकरण प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असुन दि. 31 ऑगस्ट 2022 अखेरपर्यंत ही प्रक्रीया पूर्ण करण्यात यावी.   तरी सर्व नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा निरंतर लाभ मिळवा यासाठी ई - केवायसी करण्याचे आवाहन नोडल अधिकारी पीएम किसान योजना तथा निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

No comments:

Post a Comment