जालना दि. 11 (जिमाका) :- भारतीय स्वातंत्र्याला
75 वर्षे पुर्ण होत असल्याच्या पार्श्वभुमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या
स्मृती तेवत रहाव्यात. स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतीकारक, स्वातंत्र्य
घडलेल्या संग्रामात विविध घटना यांचे स्मरण व्हावे. स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुलींग
कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात रहावी. या उद्देशाने
दिव्यमान इतिहासाचे अभिमानपुर्वक सस्मरण करण्यासाठी आझादी का अमृत महोत्सव अर्थात “स्वातंत्र्याचा
अमृत महोत्सव” अंतर्गत दि. 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये
केंद्र शासनाच्या सुचनेनुसार “हर घर तिरंगा” हा उपक्रम राबविण्यात
येत आहे.
जालना जिल्ह्यातील,
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम नोंदणी झालेल्या
सर्व दुकाने व आस्थापना मालक यांनी दि. 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये
आपल्या आस्थापनांवर राष्ट्रध्वज उभारावा. केंद्रीय गृह विभागाच्या अधिसुचनेद्वारे राष्ट्रध्वज
हे हाताने कातलेल्या आणि हाताने विनलेल्या किंवा मशिनद्वारे तयार केलेल्या सुत, पॉलीस्टर,
सिल्क, खादीपासुन बनविलेल्या कापडाचे असावेत, बदलेल्या तरतुदीनुसार तयार करण्यात आलेल्या
राष्ट्रध्वाचा वापर या प्रयोजनासाठी करता येईल. उपक्रम राबवितांना भारतीय ध्वज संहीतेचे
पालन व्हावे व जाणते, अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये याची दक्षता सर्व दुकाने
व आस्थापना मालकांनी घ्यावी. असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी, यांच्यामार्फत करण्यात
येत आहे.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment