जालना,
दि. 9 – कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे
मजुर, स्थलांतरित, बेघर तसेच
विद्यार्थी आदींचे जेवणाअभावी हाल होत
असल्याने शिवभोजन थाळीची किंमत ३० मार्च, 2020 पासुन तीन
महिन्यांच्या कालावधीसाठी 5 रुपये एवढी निश्चित करण्यात आली होती. शिवभोजन योजनेंतर्गत पाच
रुपयांमध्ये जेवण उपलब्ध करुन देण्याच्या कालावधीमध्ये 30 सप्टेंबर,2020
पर्यंत मुदतवाढ करण्यात आली असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती
रिना बसेय्ये यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
*******
No comments:
Post a Comment