जालना,दि. 31 (जिमाका):-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यामध्ये सामाजिक अंतर न
पाळणाऱ्या तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर पोलीस तसेच जिल्हा
प्रशासनामार्फत संयुक्तरित्या दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. दि.31 जुलै, 2020 रोजी
सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या 204 व्यक्तींकडून 40
हजार 400 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
यामध्ये
जालना तालुक्यात 142 व्यक्तींकडून 29 हजार
500 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे तर बदनापुर 21
व्यक्तींकडून 2 हजार 100, जाफ्राबाद 9 व्यक्तींकडून 2 हजार
400, परतुर 32 व्यक्तींकडून 6 हजार 400 रुपये अशा प्रकारे एकुण 204 व्यक्तींकडून 40 हजार 400 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
नागरिकांनी आवश्यकता नसताना घराबाहेर पडु नये, सामाजिक अंतराचे पालन करावे,
सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा तसेच प्रशासनामार्फत देण्यात
येणाऱ्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे,असे आवाहन जिल्हा
प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
*******
No comments:
Post a Comment