जालना, दि.26 (जिमाका) :- जिल्ह्यातील ज्या अनुसूचित जाती प्रवर्गाच्या
विद्यार्थ्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आहेत, त्यांनी तात्काळ महाडिबीटी प्रणालीवरील
लॉगिनमधुन सदरील कागदपत्र अपलोड करुन अर्ज सादर करावेत व महाविद्यालयांशी संपर्क साधून
अर्ज मंजुर झाल्याची खात्री करावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त अमित घवले
यांनी केले आहे.
शैक्षणिक वर्ष सन 2021-22 मधील प्रवेशित
व भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेसाठी महाडिबीटी प्रणालीवर अर्ज केलेल्या परंतु त्रुटी
पुर्ततेअभावी विद्यार्थी व महाविद्यालयीनस्तरावर प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांचे
अर्ज दि. 15 सप्टेंबर 2022 रोजी शासन स्तरावरुन रिजेक्ट करण्यात आले होते. या अर्जावर
कार्यवाही होण्यासाठी शासन स्तरावरुन पुर्नविलोकनासाठी महाविद्यालय लॉगिनवर अर्ज अद्यावत
करुन दिले आहेत. अशा प्रलंबित अर्जामधील त्रुटींची पुर्तता महाविद्यालयांनी संबंधित
विद्यार्थ्यांना संपर्क करुन त्यांच्याकडुन तात्काळ करुन घेण्यात यावी अन्यथा अनु.जाती
प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक शुल्क घेण्याचा अधिकार
महाविद्यालयांना राहणार नाही. तसेच ही प्रकीया विहीत मुदतीत न केल्यास व सन
2021-22 वर्षासाठीची लिंक बंद झाल्यास आणि शासन स्तरावरुन शिष्यवृत्ती अर्ज रद्द (reject) झाल्यास त्यास समाज कल्याण विभाग
जबाबदार असणार नाही. असे सहायक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे
कळविले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment