जालना, दि. 31 (जिमाका)
:- जिल्ह्यात सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळ्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये सर्वधर्मीय आदिवासी,
आत्महत्याग्रस्त शेतकरी, कोरोनामध्ये मृत झालेल्याची मुले, शहीद जवान यांची मुले, बेघर/
पारधी समाज / गरीब गरजू / ऊसतोड कामगार /विमुक्त भटक्या जाती जमाती /अनुसूचित जाती
जमाती व इतर मागासवर्गीय यांची मुले-मुली, व अनाथ मुले-मुली आदींचे विवाह
प्राधान्याने करण्यात येणार आहेत. तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी समिती सदस्य अथवा
जालना येथील सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक
धर्मादाय आयुक्त वि.स. मेंढे यांनी केले आहे.
धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे आदेशानुसार जालना
जिल्ह्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक संस्थांच्या विश्वस्थांची बैठक जालनाचे सहायक धर्मादाय आयुक्त विनय मेंढे
यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीत जालना जिल्ह्यासाठी सर्वधर्मीय सामुहिक
विवाह सोहळा समिती गठीत करण्यात आली आहे. समितीमध्ये अध्यक्ष म्हणून सुदामराव सांडूजी
सदाशिवे यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणून रमेश छोटाभाई पटेल, सचिव म्हणून अॅड. संतोष शंकरलाल तवरावाला, सहसचिव
म्हणून विमल अशोकराव आगलावे, कोषाध्यक्ष
म्हणून शामकुमार गणेशलाल जैस्वाल, सदस्य
म्हणून सुरेश जुगलकिशोरजी लाहोटी, मनोहर दगडूबा सरोदे, डॉ. राधाकिसन बाळासाहेब
ठोके, नागसेन संपतराव बनकर, फादर चांगदेव गणपती भाकरे, ओमप्रकाश तुळशीराम जाधव, सुरेश
गोविंदराव कुलकर्णी, अॅड. ऋषभचंद काशिनाथराव माद्रप, अॅड. प्रदीप वामनराव कुलकर्णी,
अॅड. एकनाथ देविदास महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. असे सहायक
धर्मादाय आयुक्त, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment