जालना,
दि. 1 (जिमाका) :- केंद्र शासनाच्या निर्णयान्वये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत पात्र
लाभार्थ्यांना दि. 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत अनुज्ञेय असलेले अन्नधान्य मोफत वितरीत करण्याबाबत जिल्हा पुरवठा
अधिकारी यांनी सर्व तहसीलदारांना पत्रान्वये कळविले आहे.
केंद्र
शासनाच्या निर्णयाच्या अनुषंगाने आपल्या कार्यक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सर्व रास्तभाव दुकानदार यांना मोफत अन्नधान्य वितरणाबाबत कळविण्यात
यावे. तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत रास्तभाव दुकानातुन
मिळणाऱ्या मोफत अन्नधान्यबाबत पात्र लाभार्थ्यांमध्ये जनजागृती करुन उचित
कार्यवाही करावी, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment