जालना, दि. 31 (जिमाका)
:- शासनाचे राजपत्र अधिसुचना दि. 9 नोव्हेंबर
2022 अन्वये दहा वर्षांनी आधारकार्ड अद्यावत करणे आवश्यक आहे. आधारकार्ड काढल्यानंतर
कालांतराने अनेक बदल होतात. संपुर्ण पत्ता, बोटांचे ठसे, नावातील चुका, मोबाईल क्रमांक
नोंदीचे आधारकार्डवर अद्यावतीकरण होणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ज्या नागरिकांना
आधार नोंदणी करुन दहा वर्ष इतका कालावधी पूर्ण झाला आहे, अशा व्यक्तींनी आपले आधारकार्ड myaadhaar.uidai.gov.in या संकेतस्थळावर
किंवा आपले जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जाऊन अद्यावत करुन घ्यावे, असे आवाहन निवासी
उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी केले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment