Tuesday 24 January 2023

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन


     जालना दि. 24 (जिमाका) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील जे विद्यार्थी शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी  पात्र असून प्रवेश मिळालेला नाही.  अशा विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येते. तरी जालना जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील पात्र विद्यार्थ्यांनी मंगळवार दि. 31 जानेवारी 2023 पर्यंत संबंधित महाविद्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त अमित घवले यांनी केले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील जे विद्यार्थी शासकीय वसतीगृह प्रवेशासह पात्र असून प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे. म्हणुन भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधित अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. संबंधित महाविद्यालयांनी दि.5 फेब्रुवारी 2023 पर्यंत विद्यार्थ्यांचे प्राप्त अर्ज समाज कल्याण कार्यालय, जालना येथे सादर करावेत. असेही कळविण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत लाभाच्या स्वरुपात  अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये रक्कम थेट वितरीत करण्यात येते.  यामध्ये भोजन भत्ता  25 हजार रुपये, निवास भत्ता 12 हजार रुपये, निर्वाह भत्ता 6 हजार रुपये  प्रति विद्यार्थी एकुण संभाव्य वार्षिक खर्च 43 हजार रुपये या रकमे व्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5 हजार रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 2 हजार रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल. विद्यार्थी अनुसुचित जाती व नवबौध्द या प्रवर्गातील असावा, विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा, विद्यार्थी कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही, शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला असावा, विद्यार्थ्यांस इयत्ता दहावी, बारावी, पदवी, पदवीकामध्ये किमान 50 टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. या योजनेमध्ये दिव्यांग अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के आरक्षण असेल व गुणवत्तेची मर्यादा 40 टक्के असेल, विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न रुपये 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे, विद्यार्थी स्थानिक नसावा, विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेल्या शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे. अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवासी नसावा, या योजनेचा लाभ  घेण्यासाठी जालना नगरपालिका क्षेत्रामध्ये असलेल्या महाविद्यालये तसेच जालना नगरपालिका हद्दीपासून 5 किलोमीटर परिसरात असलेली महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीच अर्ज सादर करावा, बारावी नंतर पदवीका, पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम या दोन वर्षापेक्षा आणि पदवीनंतर पदविका पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षापेक्षा कमी नसावा, विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती किमान 75 टक्के असणे आवश्यक आहे. याप्रमाणे निकष असतील. असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment