जालना,
दि. 24
- शासनाकडून माहे जुलै 2020 करिता प्रधान्य
कुटुंब योजनेनुसार प्रतिलाभार्थी 2 किलो
तांदूळ याप्रमाणे नियतन प्राप्त झाले असून शासनाकडून प्राप्त नियतनानुसार
तालुकानिहाय लाभार्थी प्रमाणानुसार नियतन देण्यात आले आहे.
जालना
(ग्रामीण) साठी 609 क्विंटल, जालना टी एफ (बदनापूरसाठी) 150 क्विंटल, भोकरदन 585 क्विंटल, जाफ्राबाद-290 क्विंटल, परतुर-400 क्विंटल, मंठा- 300 क्विंटल, अंबड -519 क्विंटल, घनसांवगी/अंबड टीएफ, (घनसांवगीसाठी ) 162 क्किंटल या प्रमाणे वाटप करण्यात आले आहे.
शासनाने ठरवून दिलेल्या देय नियतनाप्रमाणे उपलब्धतेनुसार अन्नधान्य वितरित करावे.
सदर धान्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या कार्यपध्दतीप्रमाणे वितरित
करण्याची दक्षता घेण्यात यावी. कार्डधारकांना स्वस्त दुकानाच्या माध्यमातून या
धान्याचे वाटप होत असल्याची खात्री करण्यात यावी, असे जिल्हा पुरवठा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दी पत्राकाव्दारे कळविले आहे.
*********
No comments:
Post a Comment