जालना,दि,11:- (जिमाका) -
केंद्रशासनाच्या आर्थिक उपाययोजने अंतर्गत आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य
योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या निर्देशानुसार अन्न सुरक्षा योजने अंतर्गत
कोणत्याही राज्य योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विना शिधापत्रिकाधारक व्यक्तींना
माहे मे व जुन 2020 प्रति लाभार्थीं 5
किलो तांदुळ देण्यात येणार आहे.
जालना तालुक्यात 20 हजार 952 लाभार्थीं संख्या असुन त्यांना
प्रत्येक 5 किलो प्रमाणे मे महिन्यात 1 हजार
48 क्विंटल ,जुन महिन्यात 1 हजार
48क्विंटल तांदुळ देण्यात येणार आहे,बदनापुर तालुक्यात 1 हजार 183 लाभार्थीं संख्या असुन
त्यांना प्रत्येक 5 किलो प्रमाणे मे महिन्यात
59 क्विंटल ,जुन महिन्यात 59
क्विंटल तांदुळ देण्यात येणार आहे,भोकरदन तालुक्यात 35 हजार 618 लाभार्थीं संख्या असुन
त्यांना प्रत्येक 5 किलो प्रमाणे मे महिन्यात
1 हजार 781 क्विंटल ,जुन महिन्यात 1 हजार 781 क्विंटल
तांदुळ देण्यात येणार आहे,जाफ्राबाद
तालुक्यात 5 हजार 154 लाभार्थीं
संख्या असुन त्यांना प्रत्येक 5 किलो प्रमाणे मे महिन्यात 258 क्विंटल ,जुन महिन्यात 258 क्विंटल
तांदुळ देण्यात येणार आहे,परतुर तालुक्यात 2 हजार 16 लाभार्थीं संख्या असुन त्यांना प्रत्येक 5 किलो
प्रमाणे मे महिन्यात 101 क्विंटल जुन महिन्यात 101 क्विंटल तांदुळ देण्यात येणार आहे,मंठा तालुक्यात 1
हजार 474 लाभार्थीं संख्या असुन त्यांना प्रत्येक 5 किलो प्रमाणे मे महिन्यात 74 क्विंटल जुन महिन्यात 74 क्विंटल तांदुळ देण्यात येणार आहे,अंबड तालुक्यात 4
हजार 174 लाभार्थीं संख्या असुन त्यांना प्रत्येक 5 किलो प्रमाणे मे महिन्यात 209 क्विंटल जुन महिन्यात 209 क्विंटल
तांदुळ देण्यात येणार आहे,घनसावंगी तालुक्यात 9 हजार 656 लाभार्थीं संख्या
असुन त्यांना प्रत्येक 5 किलो प्रमाणे मे महिन्यात 483 क्विंटल जुन महिन्यात 483 क्विंटल तांदुळ देण्यात येणार आहे, असे एकुण 8 हजार 227
लाभार्थ्यांना मे महिन्यात 4 हजार 13 क्विंटल व जुन महिन्यात 4 हजार 13 क्विंटल
तांदुळ वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जालना
यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment