Wednesday 24 June 2020

मौजे निरखेडा येथील सोयाबीन पेरलेल्या शेतीची जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडून पाहणी




जालना (जिमाका) दि. 24 :-   खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांकडून सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर पेरणी करण्यात आली. पेरणीनंतर काही गावातील बियाणांची उगवण होत नसल्याबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जालना तालुक्यातील मौजे निरखेडा येथील श्री जाधव या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन महाबीजकडून घेतलेल्या सोयाबीन बियाण्याची कमी पेरणी झालेल्या क्षेत्राची पहाणी करुन उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
     यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, तालुका कृषी अधिकारी श्री गाडे, मोहीम अधिकारी श्री कराड, मंडळ कृषी अधिकारी श्री सुखदेवे, कृषी सहाय्यक श्रीमती कुलकर्णी व गावातील शेतकरी उपस्थित होते.
000000

No comments:

Post a Comment