जालना, दि.
21 (जिमाका)- मा. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा
कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहिता अंमलात आल्याने जालना
जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपुर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय न्याय
वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या
उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधी किंवा त्यांच्या हितचिंतकाने सार्वजनिक
इमारतीच्या ठिकाणी,
सार्वजनिक रस्त्यावर, निवडणूकीसंबंधी
पोस्टर्स, बॅर्नस, पॉम्प्लेट्स, कटआऊट्स, होर्डीग्ज, कमानी
लावणे या व इतर बाबीमुळे रहदारीस अडथळा निर्माण होवु शकेल किंवा अपघात होण्याची
शक्यता नाकारता येत नसल्यामुळे आदेशाव्दारे निर्बंध जारी करण्यात आले आहेत.
जिल्हादंडाधिकारी
जालना यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे
कलम 33 (1)(डीबी) अन्वये निवडणूकीचे साहित्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर
रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल अशा पध्दतीने लावण्यास निवडणूक प्रक्रिया
पूर्ण होईपर्यंत (दिनांक 6 जून 2024 पर्यंत) निर्बंध घातले आहेत, असे
जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment