जालना, दि. 21 (जिमाका)- मा. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहिता अंमलात आल्याने जालना जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्हादंडाधिकारी/उपविभागीय दंडाधिकारी/तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यावर कोणत्याही राजकीय पक्षाने, व्यक्तीने, संघटनेने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने किंवा त्याच्या हितचिंतकाने धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
जिल्हादंडाधिकारी
जालना यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये सर्व शासकीय, निमशासकीय
कार्यालय/संस्था,
शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्याच्या
ठिकाणी धरणे आंदोलन,
मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणूक
प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दि. 6 मार्च 2024 पर्यंत) निर्बंध घातले आहेत, असे
जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.
-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment