जालना,
दि.21 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा
सार्वत्रिक निवडणूक 2024 कार्यक्रम दि. 16 मार्च 2024 रोजी घोषित केला आहे.
निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली
आहे. सदर निवडणूकीच्या प्रचार मोहीमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार
तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे वाहनांवर
ध्वनीक्षेपक बसवून मोठ्या आवाजातून प्रचार केल्यास ध्वनी प्रदुषण होणे, सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील शांततेस व स्वास्थास
बाधा पोहोचण्याची व उशीरा रात्री पर्यंत ध्वनीक्षेपण यंत्रणा चालु ठेवण्याची
शक्यता असल्यामुळे सदर बाबींवर निर्बंध घालणे आवश्यक आहेत. तरी मुंबई पोलीस
अधिनियम 1951 चे कलम 33 (एन) मधील
प्राप्त अधिकारानूसार निवडणूकीच्या प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाच्या वापरावर
खालीलप्रमाणे निर्बंध घालण्यात आले आहेत, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ.श्रीकृष्ण
पांचाळ यांनी जारी केले आहेत.
ध्वनीक्षेपकाचा
वापर पोलीस अधिकारी यांच्या परवानगी शिवाय करता येणार नाही. सकाळी 6 वाजण्यापूर्वी आणि रात्री 10 वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व
कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपकाचा वापर
करता येणार नाही. दिवसा प्रचाराकरिता फिरणाऱ्या वाहनांनी ध्वनी क्षेपकाचा वापर
विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा, ध्वनी
क्षेपकाच्या आवाजासह फिरणाऱ्या वाहनास
प्रतिबंध असेल. सर्व राजकीय पक्ष आणि
उमेदवार आणि इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनी क्षेपकाच्या वापरासंबंधीत
घेतलेल्या परवानगीची माहिती
जिल्हादंडाधिकारी, संबंधित
निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधीत यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील. ध्वनीवर्धकांचा मग ते एका जागी
लावलेले असोत किंवा चालत्या वाहनावर बसविलेले असोत, त्यांचा सकाळी 6 वाजेपूर्वी किंवा रात्री 10 वाजेनंतर आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या लेखी पूर्व परवानगीशिवाय
करण्यात येऊ नये. संबंधित प्राधिकाऱ्याच्या लेखी पूर्व परवानगीशिवाय सार्वजनिक
सभा आणि मिरवणुकांमध्येही ध्वनीवर्धकाचा वापर करण्यात येऊ नये. हे आदेश निवडणूक
प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दि.6 जुन 2024)अंमलात राहतील. असेही आदेशात नमुद
करण्यात आले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment