Tuesday 19 December 2023

शासकीय योजना गावागावांत नेणारी “विकसित भारत संकल्प यात्रा” बुधवार, 20 डिसेंबर रोजीचे यात्रेचे वेळापत्रक जालना, दि.19 (जिमाका) :- केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ वंचित घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने “विकसित भारत संकल्प यात्रा” सध्या जालना जिल्ह्यात सुरु आहे. या यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या लोकल्याणकारी योजनांची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. शासकीय योजना गावागावांत नेणाऱ्या या “विकसित भारत संकल्प यात्रे” ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. बुधवार, दि. 20 डिसेंबर रोजी पुढील गावात जाणार “विकसित भारत संकल्प यात्रा” - विकसित भारत संकल्प यात्रा बुधवार, दि. 20 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील जालना तालुक्यातील राठोडनगर व शिवणी, जाफ्राबाद तालुक्यातील अळंद व हिवराबळी, अंबड तालुक्यातील मसई व गोविंदपूर, भोकरदन तालुक्यातील लिंगेवाडी, खोडकी, मंठा तालुक्यातील किरला व दघ, परतूर तालुक्यातील रायपूर व सिरसगाव येथे जाईल. या यात्रेसमवेत पंचायत समिती अंतर्गत अधिकारी-कर्मचारी असतील. विकसित भारत संकल्प यात्रेस ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. यात शिक्षणापासून ते आरोग्यापर्यत, स्वयंरोजगारापासून कृषीपर्यंत विविध योजनांचा समावेश आहे. या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान विविध योजनांचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. -*-*-*-*-



 


जालना, दि.19 (जिमाका) :- केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ वंचित घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा”  सध्या जालना जिल्ह्यात सुरु आहे. या यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या लोकल्याणकारी योजनांची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. शासकीय योजना गावागावांत नेणाऱ्या या  “विकसित भारत संकल्प यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.  

बुधवार, दि. 20 डिसेंबर रोजी पुढील गावात जाणार विकसित भारत संकल्प यात्रा - विकसित भारत संकल्प यात्रा बुधवार, दि. 20 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील जालना तालुक्यातील राठोडनगर व शिवणी, जाफ्राबाद तालुक्यातील अळंद व हिवराबळी, अंबड तालुक्यातील मसई व गोविंदपूर, भोकरदन तालुक्यातील लिंगेवाडी, खोडकी, मंठा तालुक्यातील किरला व दघ, परतूर तालुक्यातील रायपूर व सिरसगाव

येथे जाईल. या यात्रेसमवेत पंचायत समिती अंतर्गत अधिकारी-कर्मचारी असतील.

विकसित भारत संकल्प यात्रेस ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. यात शिक्षणापासून ते आरोग्यापर्यत, स्वयंरोजगारापासून कृषीपर्यंत विविध योजनांचा समावेश आहे. या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान विविध योजनांचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment