जालना, दि. 14 (जिमाका) :- औरंगाबाद डाक विभागात डाक जीवन विमा/ग्रामीण डाक जीवन विमा एजंट
यांची थेट मुलाखतीद्वारे निवड होणार आहे. त्यासाठी आवश्यक पात्रता निकष
पुढीलप्रमाणे आहेत.
वयोमर्यादा-
18 ते 50 वर्षे, शैक्षणिक पात्रता – अर्जदार हा किमान 10 वी उत्तीर्ण अथवा केंद्र/
राज्य सरकार समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा, श्रेणी- सुशिक्षित बेरोजगार, निवृत्त
शिक्षक, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट, माजी जीवन विमा सल्लागार/ इतर
विमा कंपन्याचे माजी अभिकर्ते/ स्वयंरोजगार वा उपरोक्त पात्रता असलेले इच्छुक,
उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येईल. व्यावसायिक कौशल्य,
व्यक्तिमत्त्व, जीवन विम्या बाबतचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान तसेच स्थानिक परिसराची
माहिती इत्यादी बाबी आवश्यक निवड झालेल्या उमेदवारास रुपये 5 हजारची अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणुन ठेवणे
बंधनकारक राष्ट्रीय बचत पत्र/ किसान विकास पत्र स्वरुपात असेल. प्रशिक्षण पूर्ण
झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपात परवाना देण्यात येईल, जी
IRDA ची परवाना परीक्षा उत्तीर्ण
झाल्यानंतर कायम स्वरुपाच्या परवान्यामध्ये रुपांतरीत केला जाईल.
सर्व
इच्छुकांनी जालना प्रधान डाकघर, जालना – 431203 येथे जन्म तारीख व शैक्षणिक
पात्रतेच्या पुराव्यासाठी लागणारे मुळ कागदपत्रे, त्या कागदपत्रांची एक साक्षांकित
प्रत, आधार कार्ड, पॅन कार्ड व दोन पासपोर्ट आकाराच्या छायाचित्र तसेच खालील
नमुन्यातील अर्जासह दि. 25 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 4.00
वाजेपर्यंत मुखालतीसाठी उपस्थित रहावे. नियुक्ती ही लायसन्स तसेच कमिशन तत्त्वावर
असेल, असे आवाहन प्रवर अधीक्षक डाकघर,
औरंगाबाद विभाग, औरंगाबाद यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment