जालना, दि.
21 (जिमाका) :- शैक्षणिक
वर्ष सन 2022-23 मधील प्रवेशित व भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र
अनु.जाती, विजाभज, इमाव तसेच विमाप्र प्रवर्गातील अर्ज नोंदणीसाठी दि.21 सप्टेंबर
2023 अखेरपर्यंत वेळ देण्यात आला होता. तरी जालना जिल्ह्यातील महाविद्यालयांनी
प्रवेशित विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. तसेच अर्ज महाविद्यालय स्तरावर
प्रलंबित असल्याचे दिसून आल्याने अर्ज करण्यास दि.25 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
देण्यात आली आहे. महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज प्रलंबित असलेल्या
विद्यार्थ्यांच्या अर्जाची दि.25 सप्टेंबर पुर्वीच पडताळणी करुन परिपूर्ण पात्र अर्ज
मंजूर करावेत तसेच त्रुटीचे अर्ज विद्यार्थ्यांच्या लॉगीनवर पाठवून त्रुटीची
पुर्तता करुन घ्यावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रदीप भोगले यांनी
प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment