Saturday 16 May 2020

जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील गाळ लाभधारक शेतकऱ्यांनी स्वःखर्चाने काढुन घ्यावा जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांचे आवाहन


जालना दि. 16 (जिमाका) :- जिल्ह्यामधील अनेक प्रकल्पात, सिंचन तलावात तसेच साठवण तलावातील पाणीसाठा कमी झालेला आहे. त्यामुळे बऱ्याचशा तलावात मोठया प्रमाणावर गाळ मिळु शकतो.  शेतकऱ्यांनी स्वखर्चाने गाळ काढून नेऊन या गाळाचा वापर आपल्या शेतीसाठी केल्यास, शेत जमिनीची प्रत सुधारुन जमिनीची सुपीकता वाढुन, शेती उत्पन्नात वाढ होणार आहे.   ज्या तलावात अत्यल्प पाणीसाठा आहे, किंवा जे प्रकल्प कोरडे आहेत त्यामधील गाळ काढण्याचे काम त्वरित संबंधित तलावाचे शाखा अधिकारी उप-विभागीय अधिकारी यांचे नियंत्रणाखाली करण्यात यावे. गाळ काढणेच्या कामासाठी कोविड-19 चा प्रार्दुभाव लक्षात घेता सामाजिक अंतर ठेऊन आवश्यक त्या उपाय योजना करून कामे त्वरीत हाती घ्यावीत असे आवाहन जिल्हाधिकारी रविद्र बिनवडे यांनी केले आहे.
       जलसंपदा विभागाचे मध्यम प्रकल्प लघू सिंचन तलाव जलसंधारण विभागाचे .पा.तलाव साठवण तलाव पैकी ज्या प्रमाणात गाळ काढणेसाठी बुडीत क्षेत्र उपलब्ध होईल त्याप्रमाणे सर्व कामे सुरू होतील याची दक्षता सिंचन विभागाने घ्यावी. तलावातील गाळ काढल्यामुळे तलावाची पाणी साठवण क्षमतेमध्ये वाढ होईल, तसेच सिंचन क्षमता वाढीस मदत होईल.
     जिल्ह्यातील या सर्व सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या गाळाचे परिमाण तसेच शेतकऱ्यांना सदर गाळ स्वखर्चाने घेऊन जाता यावा यासाठी संबंधीत   सिंचन प्रकल्प निहाय पाटबंधारे विभागांचे नियंत्रण उपविभागीय अधिकारी आणि शाखा अभियंता यांचेशी संपर्क साधावा.    यासाठी लाभधारक शेतकरी यांना संबंधित तलाठी,  तहसिलदार यांनी गाळ काढण्यासाठी सहकार्य करावे. अशा सुचना देखील जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
      सध्या उन्हाळ्याच्या कालावधीत शेतीमधील मशागतीची कामे सुरु आहेत.  त्यासाठी सर्व संबंधीत यंत्रणानी तलावात उपलब्ध असलेला गाळ शेतकऱ्यांना शेतीसाठी स्वखर्चाने काढणार असतील, तर त्यासाठी तातडीने नियोजन करुन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. त्याचप्रमाणे जे शेतकारी स्वर्खर्चाने गाळ घेऊन जाण्यास तयार असतील, त्यांनी संबंधीत तहसिलदार तसेच सिंचन विभागाच्या कार्यालयाकडे संपर्क करुन रितसर परवानगी घ्यावी, अशा  जिल्हाधिकारी श्री. बिनवडे यांनी सुचना दिल्या आहेत.
            सध्या  पावसाळा कालावधी लवकरच असल्याने उर्वरित कालावधीचा विचार करता विविध ठिकाणी एकाच वेळी कामे सुरू होतील याची दक्षता सर्व संबंधित यंत्रणेने घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी,जालना यांनी केले आहे
०००००

No comments:

Post a Comment