जालना, दि. 14 (जिमाका)
:- जालना
तालुक्यातील मौजपुरी सज्जाचे तलाठी हे तीन महिन्यांपासुन दिसलेच
नाहीत. म्हणुन शेतकरी संघटनेने मौजपुरी पोलीस ठाण्यात निवेदन दिल्याच्या बातम्या दि. 12 मे,
2020 रोजीच्या विविध वृत्तपत्रांमध्ये मौजपुरी
सज्जाचे तलाठी
हरवले, मौजपुरीच्या
तलाठ्याचा शोध
घ्या या मथळखालील
विविध दैनिकांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. या बातमीनुसार संबंधित तलाठी हे तीन महिन्यांपासुन सज्जा
मौजपुरी मुख्यालयी आले नाहीत,
त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात, जनमसान्य, शेतकऱ्यांना
विविध कारणांने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या अनुषंगाने तहसिलदार, जालना श्रीकांत
भुजबळ यांनी खुलासा सादर केला असुन सदर बातमीची दखल घेऊन
प्रशासनाने संबंधित सज्जाचे तलाठी एस.आर.
जाधव यांच्या कामकाजाचा आढावा घेतला असता तलाठी यांनी मागील तीन महिन्यांमध्ये त्यांच्या सज्जांतर्गत गावात हजर
राहुन पाणीटंचाई विषयक विहिर पंचनामे, पीकपेरा संदर्भातील कामे,
अवेळी पावसाचे पंचनामे, स्वस्तधान्य दुकानातील धान्य वाटपाचे
पंचनामे, चेक पोस्टवरील
कर्तव्य, आदी कामे
केलेली असल्याचे निरीक्षणावरुन दिसुन आले. त्यामुळे वरील मथळयांखाली विविध बातमीमध्ये तथ्य नसल्याचे त्यांनी खुलाशामध्ये म्हटले आहे.
*******
No comments:
Post a Comment