जालना, दि. 14 - जालना जिल्हयात कोविड -19
विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनामार्फत योग्य उपाययोजना करण्यात येत
आहेत. तथापि, समाजातील काही अतिजोखमीच्या गटाला म्हणजेच क्षयरुग्ण,कुष्ठरुग्ण , एचआयव्ही
संक्रमीत रुग्ण,मधुमेही,उच्च रक्तदाब असणारे रुग्ण,कर्करोग असणारे रुग्ण तसेच
नवजात बालके ,गरोदर माता यांना तसेच समाजातील सर्व रुग्णांकरीता दैनंदिन आरोग्य
सेवा नियमित सुरु ठेऊन अतिजोखमीच्या रुग्णांकडे विशेष लक्ष देऊन त्यांना वेळीच
औषधोपचार व आरोग्य सेवा देण्याचे निर्देश जिल्हाधिकारीरवींद्र बिनवडे यांनी एका
आदेशान्वये दिले आहेत.
*******
No comments:
Post a Comment