Monday 18 May 2020

पालकमंत्री ना.राजेश टोपे यांच्या पाठपुराव्याने उजव्या कालव्यातून गोदावरी पात्रात पाणी!




जालना, दि. 18 - अंबड घनसावंगी तालुक्यातील गोदाकाठच्या गावांमधील नागरिकांनी जनावरांच्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी गोदापात्रात पाणी सोडण्याबाबत पालकमंत्री ना. राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. पालकमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांची शेतकऱ्यांची दखल घेऊन गोदावरी पाटबंधारे महामंडळ,कार्यकारी संचालक कडाच्या अधिकाऱ्यांना सूचना करून गोदावरी पात्रात उजव्या कालव्यातून पाणी सोडल्याने बळेगाव, आपेगाव, साष्ट पिंपळगाव, गोरी गंधारी, शहागड, वाळकेश्वर, कुरण पाथरवाला बु. आदी गावांना पाण्याचा फायदा होणार आहे तसेच दोन दिवसांनी जोगलादेवी, मंगरूळ राजाटाकळी उच्च पातळी बंधाऱ्यामध्ये पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे  नागरिकांचा जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. तसेच राजाटाकळी बंधाऱ्यातून भादली, शिरसवाडी गुंज या गावांना पाणी सोडण्यात येणार आहे त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी   शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
*******

No comments:

Post a Comment