जालना दि. 14 (जिमाका) – खरीप हंगाम 2020 जालना जिल्ह्याचे
प्रस्तावित पेरणी क्षेत्र 5.89 लक्ष हेक्टर असून कापुस, सोयाबिन, मका आणि तुर ही
प्रमुख पिके आहेत. पिकाचे प्रस्तावित पेरणी
क्षेत्र व बियाणे दर यानुसार एकुण 36 हजार 196 क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे.
दि. 13 मे 2020 पर्यंत जिल्ह्यामध्ये
सोयाबीन 5 हजार 700 क्विंटल, संकरीत कापुस 4 लक्ष 50 हजार पाकिटे , मका 2
हजार 48 क्विंटल, बाजरी 219 क्विंटल आणि मुग 120 क्विंटल बियाण्याची बाजारात
उपलब्धता झाली आहे.
जिल्ह्यासाठी
रासायनिक खतांचे मंजुर आवंटन 1 लक्ष 65 हजार 190
मेट्रीक टन मंजुर असुन 13 मे 2020 अखेर जिल्ह्यामध्ये 89 हजार 656 मेट्रीक
टन झालेली असुन त्यापैकी 46 हजार 82 मेट्रीक टन खताची विक्री शेतक-यांना कृषि सेवा केंद्रातुन POS मशिनद्वारे झाली असुन 43
हजार 574 खत साठा जिल्ह्यात शिल्लक आहे. जिल्ह्यामध्ये कोठेही खताची टंचाई नाही व
येत्या खरीप हंगामात शेतक-यांना खते आणि बियाणांचा तुटवडा होणार नाही याची काळजी कृषि
विभाग घेत आहे. शेतक-यांना दर्जेदार कृषि निविष्ठा मिळण्यासाठी जिल्हास्तरावर कृषि
विकास अधिकारी यांचे अध्यक्षेतखाली – 1 व तालुका स्तरावर संबंधित तालुक्याचे तालुका
कृषि अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली - 8 असे एकुण -9 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. बियाणे,
रासायनिक खते, व किटकनाशके बाबत तक्रारीचे निराकरणे करण्यासाठी जिल्हा स्तरावर
जिल्हा परिषद कृषि विभाग व प्रत्येक तालुक्याचे ठिकाणी पंचायत समिती कृषि विभागामध्ये
तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. या ठिकाणी शेतकरी आपली तक्रार
नोंदवू शकतात. जिल्ह्यात व राज्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव असल्याने कृषि
निविष्ठा केंद्रावरील शेतक-यांची गर्दी टाळण्याचे दृष्टीकोनातून शेतक-यांना बांधावर
बियाणे व खते पुरवठा करण्याची मोहिम राबविली जात आहे. असे कृषि विकास अधिकारी
जिल्हा परिषद जालना भिमराव रणदिवे तसेच जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जालना बाळासाहेब
शिंदे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment