Monday 27 March 2023

विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्तीबाबत आवाहन

 


जालना, दि. 27 (जिमाका) :-  शैक्षणिक वर्ष सन 2022-23 मधील प्रवेशित व भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र अनुसुचित जाती, विजाभज, इमाव तसेच विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रणालीवर अर्ज नोंदणीसाठी सुरु आहे. तरी जिल्ह्यातील महाविद्यालयांनी प्रवेशित विद्यार्थ्यांची महाडिबीटी प्रणालीवर अर्ज नोंदणी करण्यासाठी समान संधी केंद्रामध्ये नियुक्त केलेल्या समन्वयक यांची मदत घेऊन अर्ज नोंदणी वाढविण्याची दक्षता घ्यावी. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही  अर्ज नोंदणी केलेली नाही अशांना शुक्रवार दि.31 मार्च 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त अमित घवले यांनी केले आहे.

जिल्ह्यातील महाविद्यालयांचे तालुकानिहाय महाविद्यालयांचे कॅम्प घेण्यात आले असून प्रवेशित विद्यार्थ्यांची तात्काळ अर्ज नोंदणी व अर्ज मंजुर करणे, शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्क वसुल न करणे, महाविद्यालयांत समान संधी केंद्र स्थापन करण्याबाबत सहायक आयुक्त अमित घवले यांनी महाविद्यालयांच्या प्राचार्यांना सुचना दिल्या आहेत.  परंतु  दि. 27 मार्च 2023 पर्यंत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे फक्त 9 हजार 98 अर्ज नोंदणी झालेले असून मागील वर्षात जालना जिल्ह्यात नोंदणी झालेल्या 1 हजार 66 पेक्षा 1 हजार 538 अर्ज अद्यापही नोंदणी झालेली नसल्याने जालना जिल्ह्याची एकुण 85 टक्के अर्ज नोंदणी झालेली आहे. तर अद्यापही 15 टक्के अनुसुचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी महाडिबीटी प्रणालीवर शिष्यवृत्ती करीता अर्ज सादर केलेले नाहीत. अर्ज नोंदणीकरीता शासन स्तरावरुन मुदत वाढविली नसल्यास अर्ज सादर करता येणार नाही त्यास सर्वस्वी विद्यार्थी व महाविद्यालय जबाबदार राहतील. तसेच महाविद्यालीनस्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जावर संबंधित महाविद्यालयांनी दि. 31 मार्च 2023 पुर्वीच अर्जाची पडताळणी करुन पात्र अर्ज मंजुर  करावेत, असे सहायक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment