जालना,
दि. 13 (जिमाका) :- पंतप्रधानांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली भारत
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव स्वातंत्र्याची 75 वर्षे आणि तेथील लोकांचा ,
संस्कृतीचा आणि कर्तृत्वाचा गौरवशाली इतिहास साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनीही त्यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंच प्राणाचा मंत्र घोषित
केला आहे. नेहरू युवा केंद्र संघटना 1 एप्रिल ते 31 मे 2023 पर्यंत देशभरातील सर्व
जिल्ह्यांमध्ये समुदाय आधारित संस्थामार्फत " युवा संवाद - इंडिया @ 2047
" आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रम आयोजित करण्यासाठी संस्थांनी दि.20
मार्च 2023 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जालना नेहरू युवा केंद्राकडून करण्यात
आले आहे.
जिल्ह्याच्या विविध समुदाय आधारित
संस्थाच्या सहकार्याने जिल्हास्तरावर कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन आहे जे
जिल्हा नेहरू युवा केंद्राशी हातमिळवणी करून देशाच्या भविष्याबाबत सकारात्मक संवाद
निर्माण करतील. पंच प्राणांसह पंतप्रधानांच्या संकल्पनेप्रमाणे हा कार्यक्रम टाऊन हॉल स्वरूपात आयोजित केला
जाईल. ज्यामध्ये तज्ञ, जाणकार व्यक्ती
पंचप्राणवर चर्चा करतील आणि त्यानंतर किमान 500 तरुणांच्या सहभागासह प्रश्नोत्तर
सत्र होईल.
कार्यक्रम आयोजित करण्यासाठी 20,000 / -
आयोजक समुदाय आधारित संस्थाला प्रतिपूर्ती केली जाईल. अर्ज करू इच्छिणाऱ्या संस्था गैर राजकीय,
इतिहासात पक्षपाती नसलेले असले पाहिजेत आणि युवा संवाद कार्यक्रम आयोजित
करण्यासाठी पुरेशी संघटनात्मक ताकद असणे आवश्यक असेल. तसेच या संघटनांवर कोणताही फौजदारी
खटला प्रलंबित नसावा. कार्यक्रम आयोजित
करण्यासाठी प्रति जिल्हा कमाल 3 संस्था निवडण्यात येतील. निकषांची पूर्तता करणाऱ्या इच्छुकांनी आपले
अर्ज नेहरू युवा केंद्र, विशाल बिल्डिंग,
औरंगाबाद चौफुली, जालना येथून प्राप्त करावेत. अधिक माहितीसाठी gnykjalna@gmail.com वर
ई - मेल करावा. असे जालना नेहरू युवा
केंद्राकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment