जालना, दि.31 (जिमाका) :- विविध
क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या
माजी सैनिक, त्यांच्या पत्नी अथवा पाल्यांना 10 हजार रुपयांचा आणि 25 हजार रुपयांचा विशेष
गौरव पुरस्कार सन २०२२-२३ देण्यात येणार आहेत. तरी संबंधितांनी अर्ज दाखल करतेवेळी
वृत्तपत्राची कात्रणे, छायाचित्रे, प्रसिध्दी प्रकरणाची माहिती सोबत जोडून अर्ज
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय जालना येथे 20 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करावेत.
तरी या संधीचा जास्तीत जास्त माजी सैनिक व त्यांच्या पाल्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी
प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
इयत्ता दहावी, बारावीमध्ये 90 टक्के किंवा
त्यापेक्षा अधिक गुण घेतलेल्या माजी सैनिक/विधवा पत्नीचे पाल्य असावे. राष्ट्रीय/राज्य स्तरीय प्रतियोगितेत सुवर्ण
रौप्य, कास्य यापैकी पदक मिळालेले असावे. खेळामध्ये आंतराष्ट्रीय स्पर्ध्येत
भारताचे प्रतिनिधीत्व केलेले असावे. खेळामध्ये मिळविलेले प्रमाणपत्र इंडियन
ऑलम्पिक असोसिएशन, साई किंवा राष्ट्रीय फेडरेशन यांनी प्रमाणित केलेले असावे. साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य, व इतर कला
क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी / पुरस्कार प्राप्त असला पाहिजे. नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी या पुर,
जळीत, दरोडा, अपघात नैसर्गीक आपत्ती (भुकंप/वादळ) यामध्ये बहुमोल कामगिरी केलेली
असावी. शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट
कामगिरीसाठी पुरस्कार. तसेच आयआयटी, आयआयएम, एम्स अशा नामवंत संस्थांमध्ये प्रवेश
मिळालेल्या माजी सैनिकांच्या पाल्यांना सुध्दा पुरस्कार देण्यात येईल. यशस्वी उघोजकांना पुरस्कार, सामाजिक कार्य आणि
पर्यावरण विषयक पुरस्कार मिळविणारे असावेत. असेही कळविण्यात आले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment