जालना,
दि. 21 (जिमाका) :- माहिती व जनसंपर्क
महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी
वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या
जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी दिनांक
1 जानेवारी, 2022 ते 31 डिसेंबर, 2022 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या
लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका
पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी, 2023 अशी होती. आता 8 मार्च, 2023 पर्यंत
मुदतवाढ देण्यात आलेली आहे, तरी अधिकाअधिक पत्रकारांनी प्रवेशिका पाठवाव्यात, असे
आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे.
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2022 चे
माहितीपत्रक/अर्जाचे नमुने शासनाच्या
www.maharashtra.gov.in आणि महासंचालनालयाच्या dgipr.maharashtra.gov.in या
संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच राज्यातील विविध भागातील स्पर्धकांना संबंधित
जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांना,
तसेच दिल्ली येथील पत्रकारांनी आपल्या प्रवेशिका थेट किंवा महाराष्ट्र परिचय
केंद्रामार्फत मुख्यालयात माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा
राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज
प्राप्त करुन घेता येईल.
राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या
पुरस्कारामध्ये 11 राज्यस्तरीय तर, 8 विभागीय स्तरावरील पुरस्कार असे एकूण 19
पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment