जालना,
दि.22 (जिमाका): जिल्ह्यात अंबड व घनसावंगी
तालुक्यातील वाळु घाटांचे लिलाव झालेले नसुन या वाळु घाटातून वाळुची अवैध चोरी
होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अवैध वाळु चोरीमुळे कायदा व
सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने फौजदारी दंड संहिता 1973 चे
कलम 144 अंतर्गत या तालुक्यातील नदीपात्रांमध्ये वाळु चोरी रोखण्याकरीता व कायदा व
सुव्यवस्था राखणे कामी प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणुन फौजदारी दंड संहिता 1973 चे
कलम 144 लागू करण्यात आले असल्याचे आदेश अंबडचे उपविभागीय दंडाधिकारी स्वप्नील
कापडणीस यांनी निर्गमित केले आहेत.
उपविभागीय
दंडाधिकारी यांनी
फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त झालेल्या शक्तीचा वापर करुन
अंबड व घनसावंगी तालुक्यातील अनुक्रमे अंबड तालुक्यातील आपेगाव, बळेगाव, गोरी, गंधारी, शहागड, साष्टपिंपळगाव,
वाळकेश्वर, कुरण, पाथरवाला बु., गोंदी, हसनापुर, कोठाळा खु., साडेगाव, इंदलगाव,
गंगाचिंचोली (सर्व गोदावरी नदीपात्र) तसेच आवा-अंतरवाला, माहेरभायगाव, चिकनगाव,
साडेसावंगी, मठपिंपळगाव (दुधना नदीपात्र) तर घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी,
रामसगाव, मंगरुळ, भोगगाव, शिवणगाव, शेवता, लिंगसेवाडी, बाणेगाव, राजाटाकळी
(गोदावरी नदीपात्र) व रांजणी,
मुढेगाव
(दुधना नदीपात्र) मध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागु करण्यात आला आहे. आदेशाच्या
अंमलबजावणीसाठी नोटीस देण्यास पुरेसा कालावधी नसल्याने व कायदा व सुव्यवस्था
आबाधीत राहण्याच्या दृष्टीने फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 नुसार सदर
आदेशाची प्रसिध्दी उपविभागीय पोलीस अधिकारी, अंबड यांनी करावी. हे आदेश दि. 28
फेब्रुवारी 2023 पर्यंत अंमलात राहतील.असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment