जालना दि. 31 (जिमाका) :- मराठा
आरक्षणावरुन जालना जिल्ह्यात शांतता भंग होईल, असे कृत्य कुणीही करु नये.
नागरिकांनी संयम ठेवावा व शांतता राखावी. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. तसेच
कुणाला त्रास होईल, अशी कृती करु नये. हिंसक मार्गाने आंदोलने करु नयेत. कुणीही
कायदा हातात घेऊ नये, आपल्या जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी जिल्हा व पोलीस
प्रशासनाला सहकार्य करावे. अनुचित प्रकारामुळे सर्वसामान्यांना त्रास होईल, असे
कृत्य करु नये.
हिंसक घटनांना उत्तेजना न देता आपले गाव व शहरात शांतता अबाधित राखण्यासाठी
नागरिकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी
केले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment