Wednesday 1 November 2023

जिल्हाधिकारी यांचे शांतता राखण्याचे आवाहन

 


 

जालना दि. 31 (जिमाका) :- मराठा आरक्षणावरुन जालना जिल्ह्यात शांतता भंग होईल, असे कृत्य कुणीही करु नये. नागरिकांनी संयम ठेवावा व शांतता राखावी. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. तसेच कुणाला त्रास होईल, अशी कृती करु नये. हिंसक मार्गाने आंदोलने करु नयेत. कुणीही कायदा हातात घेऊ नये, आपल्या जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी  जिल्हा  पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. अनुचित प्रकारामुळे सर्वसामान्यांना त्रास होईल, असे कृत्य करु नये.  हिंसक घटनांना उत्तेजना न देता आपले गाव व शहरात शांतता अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment