Tuesday 30 May 2023

उच्च शिक्षणातील ध्येय प्राप्तीसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

 


 

जालना, दि. 30- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’ वसतिगृह प्रवेशास पात्र असलेल्या परंतू वसतिगृह प्रवेशापासून वंचित राहिलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्याची पात्रता असतानाही शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या / घेतलेल्या, निवास, भोजन सारख्या सुविधांअभावी शिक्षण घेऊ शकत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी ही योजना कार्यान्वित आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ इयत्ता अकरावी, बारावी व त्यानंतरच्या व्यवसायिक / बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विविध महाविद्यालये, शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. योजनअंतर्गत निवास, भोजनासह शैक्षणिक व अध्ययन साहित्य मोफत दिले जाते.

निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी अनुदान स्वरूपात रक्कम देण्यात येते.

 अनुज्ञेय असलेल्या रक्कमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष ५ हजार रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रति वर्ष २ हजार रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी देण्यात येते. याप्रमाणे वार्षिक खर्चासाठीची रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न खात्यामध्ये थेट वितरीत करण्यात येत असते. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, जालना येथे संपर्क साधावा.

-*-*-*-*- 

No comments:

Post a Comment